त्रिपुरातील घटनेचे पडसाद महाराष्ट्राच्या काही भागात उमटले आहेत.

मालेगाव, नांदेड, अमरावती, भिवंडी येथे मुस्लिम समाजानं मोर्चे काढले.

ठिकठिकाणी निघालेल्या मोर्चांना हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं.

मोर्चादरम्यान मालेगाव, नांदेड, अमरावतीत झालेली तोडफोड कॅमेऱ्यात कैद झाली असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे.

राज्यात काही ठिकाणी जाळपोळ, दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत.

या घटनेच्या निषेधार्थ काही ठिकाणी बंद पुकारण्यात आला आहे.

त्रिपुरा राज्यात मुस्लिम समाजावर होत असलेल्या कथित अत्याचाराच्या विरोधात काढण्यात आलेल्या रॅलीला हिंसक वळण लागलं आहे.

अमरावती शहरात हिंदू संघटनेच्या वतीने मोठ्या घोषणाबाजी सुरू.

अमरावती शहरात नागपूरचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील दाखल..

अमरावतीत बंदला हिंसक वळण, पोलिसांचा लाठिचार्ज, आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी