दिल्ली विधानसभा निवडणुकीत आप पक्षाचा आणि अरविंद केजरीवाल यांचा मोठा पराभव झाला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे भावनिक झाल्याचं दिसून आलं.

Image Source: abp majha

एवढं प्रेम केलं तुमच्यावरती

अण्णा हजारे म्हणाले की, हीच आम्ही अपेक्षा ठेवली होती तुमच्याकडून, नाईलाजास्तव आम्हाला बोलावं लागलं. एवढं प्रेम केलं तुमच्यावरती.

Image Source: abp majha

म्ही रस्ता सोडून गेलात म्हणून नाईलाजास्तव बोलावं लागलं.

Image Source: abp majha

अरविंद केजरीवाल यांना अनेक गोष्टी शिकवल्या.

Image Source: abp majha

मात्र त्यांनी समाजाचा विचार केला नाही आणि राजकारणात गेले असे सांगत असताना झाले अण्णा हजारे भावुक झाल्याचं दिसून आलं.

Image Source: abp majha

अरविंद केजरीवाल यांचे विचार, चारित्र्य शुद्ध नाही म्हणूनच त्यांचा पराभव झाल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी दिली आहे.

Image Source: abp majha

सत्ता, पैसा, दारूची दुकानं डोक्यात गेल्यामुळेच केजरीवाल यांचा पराभव झाला अशी टीका अण्णांनी केली.

Image Source: abp majha

अण्णा हजारे म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांनी ज्यावेळेस राजकारणात जायचा निर्णय घेतला आणि पक्ष काढला त्यावेळेस पासून मी त्यांच्याशी बोलणे बंद केले.

Image Source: abp majha

पक्ष काढल्यानंतर मी परत त्यांच्याशी कधीही बोललो नाही. त्या दिवसापासून मी संबंध तोडून टाकले. कारण माझ्यापुढे पक्ष विरहित समाजसेवा, देशहित हेचं प्रधान्य होतं आणि आम्हाला तेच हवं आहे.

Image Source: abp majha