आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात भाजपकडून परवेश वर्मा (Parvesh Verma) यांना उमेदवारी देण्यात आली होती. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून परवेश वर्मा यांनी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला.
याशिवाय, प्रवेश वर्मा हे जाट समुदायातून येतात, त्यामुळे त्यांच्या माध्यमातून दिल्ली आणि हरियाणातील जाट मतदारांना आकर्षित करणे भारतीय जनता पक्षाला सोपे जाईल. परवेश वर्मा म्हणाले की, दिल्लीतील जाट नेते, बंधू आणि भगिनी भाजपसोबत आहेत. दिल्लीचा विकास फक्त भाजपच करू शकते.
जाट आरक्षणाचा प्रश्न आहे, त्यासाठी राज्य सरकारला सभागृहातून कायदा करून केंद्राकडे पाठवावा लागेल, जे त्यांनी कधीही केले नाही. अरविंद केजरीवाल सतत खोटे बोलत आहेत, असा आरोप परवेश वर्मा यांनी केला आहे.
दिल्लीतील मुख्यमंत्रिपदासाठी रमेश बिधुरी यांचं नावही आघाडीवर आहे. गुज्जर समुदायातून आलेले रमेश बिधुरी यांचे त्यांच्या लोकांमध्ये एक विशेष स्थान आहे
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्या विरोधात भाजपाने उमेदवारीही दिली होती. दिल्ली निवडणूक प्रचारादरम्यान, रमेश बिधुरी त्यांच्या विधानांमुळे खूप चर्चेत राहिले आहेत.
दिल्लीतील कालकाजी मतदारसंघातील रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल बोलताना, जसे आम्ही ओखला आणि संगम विहारमधील रस्ते केले आहेत, तसेच आम्ही कालकाजीतील सर्व रस्ते प्रियांका गांधी यांच्या गालासारखे गुळगुळीत करू, असं बिधुरी म्हणाले होते.
दिल्लीतील करोल बाग येथील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार दुष्यंत कुमार गौतम हे देखील मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याचे सांगितले जात आहे. राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, दुष्यंत कुमार गौतम यांना दिल्लीचे मुख्यमंत्री करुन भाजपा सर्वांना धक्का देऊ शकतो.
अनुसूचित जातीचे मतदार आणि बिहारमधील आगामी निवडणुका लक्षात घेऊन दुष्यंत कुमार गौतम यांना मुख्यमंत्रिपद दिले जाऊ शकते.
अनुसूचित जातीचे मतदार आणि बिहारमधील आगामी निवडणुका लक्षात घेऊन त्यांना हे पद दिले जाऊ शकते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की भाजप दिल्लीतून बिहारला आकर्षित करण्याचा प्रयत्न करू शकते. याशिवाय, भाजपकडे अनुसूचित जातीचा मुख्यमंत्री नसल्याने, दुष्यंत कुमार गौतम यांना भाजपकडून मुख्यमंत्रिपदी संधी दिली जाऊ शकते.