परवा छावा सिनेमाचे दिग्दर्शक आले होते, उत्तम दिग्दर्शक आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसानं छावा पाहावा

Image Source: abp majha

निवडणुकांच्या निकालानंतर बरेच लोक मला येऊन भेटले, निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मी पहिल्यांदाच बघितलं की सन्नाटा पसरलाय. लोकांमध्येच संभ्रम होता, महाराष्ट्रात सन्नाटा पसरला हे कसलं द्योतक आहे, असा सवाल राज यांनी विचारला.

Image Source: abp majha

महाराष्ट्रातील निकालावर अनेक निवडून आलेल्यांचाच विश्वास नाही. बाळासाहेब थोरात सातवेळा आमदार झाले, 70 ते 80 हजार मताधिक्यानं निवडून यायचे त्यांचा 10 हजार मतांनी पराभव. हे केवळ मीच नाही, अख्खा महाराष्ट्र बोलतोय, निवडून आलेल्या अनेकांचे मला फोन आले आहेत, असेही राज यांनी सांगितले.

Image Source: abp majha

भाजपला 2014 मध्ये 121, 2019 मध्ये 105 जागा, पण यंदाच्या निवडणुकीत अजित पवारांना 42 जागा, कोणाचा विश्वास बसेल का, असा सवाल राज ठाकरेंनी विचारला.

Image Source: abp majha

मला एकच सांगायचंय की, जे तुम्हाला पक्षानं सांगितलं ते तुम्ही सतत लोकांपुढे मांडा. आतापर्यंत आपण काय काय केलं, कोणकोणती आंदोलन केली हे लोकांना कळवा. चार प्रश्न विचारल्यावर भांबावून जाणे हे बरं नव्हे. हा जाणीवपूर्व केलेला प्रचार असतो

Image Source: abp majha

मी थोडं मागे जातो, मी काय सांगतोय ते नीट ऐका. स्वातंत्र्यानंतर पहिली निवडणूक 1952 मध्ये झाली. सन 1975 साली आणीबाणीनंतर 77 साली झालेल्या निवडणुकीनंतर देशभरात इंदिरा गांधींचा पराभव झाला, राजनारायण यांनी इंदिरा गांधींना हरवलं होतं.

Image Source: abp majha

कुंभमध्ये किती लोक गेली अजून आकडा येत नाही, असे म्हणत कुंभमेळ्यातील गर्दी आणि चेंगराचेंगरीतील मृतांबाबत राज ठाकरेंनी प्रश्न उपस्थित केले.

Image Source: abp majha

माझ्यामागे ईडी लागली म्हणून माझा मोदींना पाठिंबा अशा गोष्टी पेरल्या गेल्या, जे सांगेन ते शिवरायांची शपथ घेऊन सांगेन. आम्ही आमचा नुकताच व्यवसाय सुरू केला, एके दिवशी पेपरमध्ये बातमी वाचली. बातमी अशी होती की एनटीसीच्या सगळ्या मिल्स काढा आणि कामगारांचे पगार देऊन टाका. एके दिवशी माझ्या सहकाऱ्याचा घाबरत घाबरत फोन आला, ज्या दिवशी मला ईडीची नोटीस आली, असा किस्सा राज ठाकरेंनी ईडीच्या नोटीसंदर्भाने सांगितला.

Image Source: abp majha

महाराष्ट्राच्या राजकारणाचा एवढा चिखल होऊन बसलाय, भाजपमधला एखादा म्हणतो चहा प्यायला घरी येतो, काय सांगू घरीच पी?' चहा प्यायची गरज काय असं सांगू का मी?, असा मिश्कील टोला राज ठाकरेंनी लगावला. एकदा चंद्रकांत पाटील मला भेटायला आले, माझ्याशी चहा घेतला आणि बाहेर पडले, चंद्रकांत पाटलांनी खुणा केल्या, असे म्हणत राजकीय भेटींवरील चर्चांवरही राज ठाकरेंनी सवाल उपस्थित केले.

Image Source: abp majha

आधी राजकारण चांगलं होतं, कोणी कोणाचा वैरी नव्हता. पक्षाची भूमिका आणि तुमचं प्रेम यांच्यासमोर लाचार ठेवणार नाही. ऑक्टोबर, नोव्हेंबरशिवाय मनपा निवडणूक होतच नाही. नगरसेवकांची ओझी कोण उचलेल, अशी भूमिका दिसतेय. सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकलेली तारीख आणखी पुढे ढकलतील. जरा सांभाळून राहा, पुढच्या काही दिवसांमध्ये पक्षाला वरपासून खालपर्यंत शिस्त पाळायची आहे.

Image Source: abp majha