पण काही फळे जास्त काळ फ्रिज मध्ये ठेवल्यास ते विषारी होण्याची शक्यता असते.

जाणून घ्या कोणती आहेत ही फळे.

1) सफरचंद :

सफरचंद रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास ते लवकर पिकतात. यामागील कारण म्हणजे सफरचंदांमध्ये आढळणारे सक्रिय एन्झाइम्स.

2) टरबूज :

उन्हाळ्यात लोक टरबूज खूप खातात. पण हे फळ इतके मोठे आहे की, ते एकाच वेळी खाणे कठीण होते.

अनेक वेळा लोक टरबूज आणि खरबूज कापून फ्रिजमध्ये ठेवतात. पण ते जास्त काळ फ्रिज मध्ये ठेवल्यास खराब होऊ शकते.

3) लिची :

उन्हाळ्याच्या दिवसात खायला स्वादिष्ट लागणारी लिची चुकूनही फ्रीजमध्ये ठेवू नये.

लिची फिजमध्ये ठेवल्याने त्याचा वरचा भाग तसाच राहतो, पण आतून लगदा खराब होऊ शकतो.

4) केळी:

केळी फ्रिजमध्ये ठेवल्यास ती लवकर खराब होते, कारण केळीच्या देठातून इथिलीन वायू बाहेर पडतो.

5) आंबा :

आंबा कधीही रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नये. त्यामुळे आंब्यामध्ये असलेले पोषक तत्वही नष्ट होतात.