काही घरगुती पेयांचा वापर करून तुम्ही 30 दिवसांत तुमचे वाढते वजन नियंत्रित करू शकतात.
वजन कमी करण्यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिसळा आणि सकाळी हे पाणी प्या.
एक ग्लास गरम पाण्यात लिंबू आणि आल्याचा रस मिक्स करून पाणी प्यायल्याने पचनसंस्था सुधारते.
एक ग्लास गरम पाण्यात त्यात चिमूटभर हळद मिसळा. कढ येईपर्यंत ते पाणी उकळा. त्यानंतर हे पाणी गाळून थंड झाल्यावर प्या. असे केल्याने वजन नियंत्रणास मदत होते.
एक कप गरम पाण्यात ओवा टाका. तो चांगला उकळल्यानंतर पाणी गाळून प्या.
एक चमचा जिरे रात्रभर एका ग्लास पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर हे पाणी कोमट उकळून प्या. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.