वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये भारत इंग्लंडकडून 10 विकेट्सने पराभूत झाला.



या विजयासह इंग्लंडने अंतिम फेरीत धडक मारली, तर भारत स्पर्धेबाहेर झाला.



ज्यानंतर कोट्यवधी चाहते तर निराश झालेच पण टीम इंडियाचे खेळाडूही कमालीचे भावूक झाले.



कर्णधार रोहित शर्माला तर अश्रू अनावर झाले त्याचा एक व्हिडीओ आणि बरेच फोटो व्हायरल झाले.



सर्वच खेळाडू निराश झाले असून सोशल मीडियावर त्यांचे फोटो व्हायरल



विराट कोहलीने संपूर्ण वर्ल्ड कप कमाल कामगिरी करुनही तो विजय मिळवू शकला नसल्याने त्याचे फॅन्स नाराज



विराटचे अनेक इमोशनल फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून विराट कमालीचा सॅड दिसत होता.



सर्वच भारतीय खेळाडूंनी स्पर्धेत चांगली झुंज दिली. पण सेमीफायनलच्या सामन्यात गोलंदाजी कमालीची खराब झाली आणि सामना गमवावा लागला.



ज्यामुळे संघातील 11 च्या 11 खेळाडू कोट्ववधी भारतीयांप्रमाणे निराश दिसून आले.




आता फायनलमध्ये पाकिस्तानसमोर इंग्लंडचं आव्हान असणार आहे.