या 10 चुकांमुळे शरीरातील अवयवांवर होतो वाईट परिणाम

Published by: जयदीप मेढे
Image Source: iStock

कान

मोठ्या आवाजात गाणे ऐकणे, कानाला योग्य विश्रांती न देणे, कॉटन बड्सचा वापर करणे, हेडफोन आणि इअरबड्सच्या अतिवापर यांसारख्या वाईट सवयीने श्रवणशक्ती कमी होऊ शकते.

Image Source: iStock

किडनी

किडनी निरोगी ठेवण्यासाठी पाणी महत्वाचे आहे. काही लोक तहान लागल्यावरच पाणी पितात. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे किडनीला नुकसान होते.

Image Source: iStock

मेंदू

मेंदूच्या चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. सतत तणावात राहिल्याने आणि नकारात्मक विचार केल्याने मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम करतात.

Image Source: iStock

डोळे

तासन् तास स्क्रीनसमोर बसून काम करत असाल तर एका तासाच्या अंतराने 30 ते 40 सेकंद डोळे बंद करून आराम करा तसेच अंधारात मोबाईल किंवा लॅपटॉपवर काम करणे टाळा.

Image Source: iStock

यकृत

यकृत पोषक तत्वांचा साठा करण्याबरोबरच शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यातही महत्त्वाची भूमिका बजावते. फास्ट फूड खाणे आणि मद्यपान केल्याने यकृतवर विपरीत परिणाम होतो.

Image Source: iStock

पोट

खूप वेळ उपाशी राहिल्याने पोटाचे आरोग्य बिघडते तसेच शिळं अन्न खाणे, अन्नाबरोबर पाणी पिणे, वेळेवर जेवण न करणे या वाईट सवयीने पोट दु:खी सारखी समस्या होते.

Image Source: iStock

हृदय

हृदयाचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी व्यायाम आणि योग्य आहार घेणं महत्त्वाचं आहे. जास्त मीठाचे सेवन केल्याने हृदयावर विपरीत आणि हानिकारक परिणाम होतो.

Image Source: iStock

फुफ्फुसे

धूम्रपान केल्याने फुफ्फुसांचे नुकसान होते. ग्रीन टी, हर्बल टी, टोमॅटो, हळद, भोपळा, रिकाम्या पोटी सफरचंद असे काही पदार्थ खाल्याने फुफ्फुसे निरोगी राहू शकतात.

Image Source: iStock

स्वादुपिंड

स्वादुपिंड एखाद्याच्या पित्ताशयाच्या जवळ पोटाच्या मागे स्थित असतो. स्वादुपिंडाच्या लक्षणांमध्ये त्वचेला खाज सुटणे, कावीळ आणि पायांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होणे ही लक्षणे दिसून येतात.

Image Source: iStock

आतडे

फोटो काढताना पोट दिसू नये म्हणून अनेकजण श्वास खेचून पोट आतमध्ये घेण्याचा प्रयत्न करतात असं केल्याने आतड्यावर ताण येतो. याशिवाय थंड आणि तेलकट अन्न खाल्ल्याने आतड्यांवर विपरीत परिणाम होतो.

Image Source: istock

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Image Source: iStock