लोकांचा नेता, जननायक अशी ओळख असणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे यांच्या
आयुष्यावर आधारित असलेला 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' हा सिनेमा आजही चर्चेत आहे.
एका वर्षापूर्वी या सिनेमाचे 400 पेक्षा अधिक स्क्रीन्सवर 10,000 हून अधिक शोज लागले होते.
आज हा सिनेमा प्रदर्शित होऊन एक वर्ष पूर्ण झालं आहे.
'धर्मवीर'ला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खास पोस्ट लिहिली आहे.
'धर्मवीर' सिनेमाला संपूर्ण महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला : एकनाथ शिंदे
दिघे साहेब असेच कायम पाठीशी रहा : प्रसाद ओक
तसेच अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
'धर्मवीर 2'ची घोषणा करण्यात आली असून 2024 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या सिनेमाच्या माध्यमातून आनंद दिघेंच्या मृत्यूचं रहस्य उलगडणार का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.