अवघ्या राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहचला असून आज लाडक्या बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जात आहे.



राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर बाप्पा विराजमान झाले होते.



आज अनंत चतुर्दशी निमित्त सागर बंगल्यावरी बाप्पांचं आज विसर्जन करण्यात आले.



पर्यावणाला हानी पोहचु नये म्हणून या बाप्पांचं महानगरपालिकेच्या कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आलं.



यावेळी अमृता फडणवीस देखील त्याच्यासोबत होत्या.



‘सागर’ निवासस्थानी देवेंद्र फडणवीसांनी सहकुटुंब बाप्पाना निरोप दिला.



यावेळी 'गणरायाच्या भक्तीने तल्लीन झालेले मन आज बाप्पाचा निरोप घेताना भरून आले' अशी पोस्ट देवेंद्र फडणवीस यांनी केली.



त्यासोबतच 'बाप्पाचा आशीर्वाद सदैव सोबत असेल याच विश्वासाने पुढच्या वर्षी बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज राहू' असंही ते म्हणाले.