'कॉफी विथ करण 8' हा लोकप्रिय टॉक शो कार्यक्रम आहे.



या पर्वाच्या तिसऱ्या भागात सारा अली खान आणि अनन्या पांडे हजेरी लावणार आहेत.



'कॉफी विथ करण 8'च्या मंचावर सारा अली खानने पहिल्यांदाच कार्तिक आर्यनसोबतच्या रिलेशनवर भाष्य केलं आहे.



करण जौहरने विचारलं की,नातं संपल्यानंतर मैत्री कायम ठेवणं ही सोपी गोष्ट आहे का?.



सारा अली खान म्हणाली,मैत्री असो, व्यावसायिक काम असो वा नातं असो. एखाद्या गोष्टीवर मी वेळ खर्च करत असेल तर मला या कोणत्या गोष्टीचा फरक पडत नाही.



तुम्ही एखाद्या गोष्टीत न अडकता पुढे जायला हवे.



इंडस्ट्रीत कधीच कोणी कोणाचा मित्र नसतो. परिस्थितीनुसार तुमची मैत्री अवलंबून असते.



सारा अली खान आणि कार्तिक आर्यन गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.



करण जोहरने स्वत: या प्रकरणाचा खुलासा केला आहे.



पण काही कारणाने त्यांचं नातं बिनसलं आणि त्यांचा ब्रेकअप झाला.