कानदुखीवर लसूण परिणामकारक ठरतं. तिळाच्या किंवा खोबरेल तेलात लसणाच्या पाकळ्या ठेचून घालाव्यात.
हे तेल गरम करून, गाळून दुखऱ्या कानात दोन-तीन थेंब घालावेत.
सर्दीमुळे कान दुखत असेल तर कापसाचा बोळा हिंगाच्या तेलात बुडवून कानात ठेवावा.
कडुनिंबाच्या तेलाचे दोन-तीन थेंब दिवसातून दोन तीन वेळा कानात घालावेत.
कांद्याचा रस गरम करुन तो कानात घातल्यामुळे कानातून पू येणं थांबतं आणि कानदुखी बरी होते.
कानदुखीवर झेंडूच्या पानांचा रस, तुळशीचा रस, लवंग घातलेलं तिळाचं तेल देखील वापरु शकतो.
15 ते 20 मिनिटं सूर्यप्रकाशात बसल्यामुळे कानातील जंतूसंसर्ग कमी होतो, पू होत नाही आणि कानदुखीपासून आराम मिळतो.
कानात एखादा जीवजंतू गेल्यामुळे कान दुखत असेल तर राईचं तेल कानात घालावं.
त्यामुळे कानातील जीवजंतू मरतात आणि कानदुखीपासून आराम मिळतो.
कान दखत असेल तर त्यामध्ये खोबरेल तेल घालावं त्यामुळे कानाला आराम मिळतो.