नवरात्रीमध्ये अष्टमी आणि नवमी तिथीला कन्यापूजन केले जाते. धार्मिक शास्त्रांनुसार नवरात्र, कन्या पूजनशिवाय अपूर्ण मानली जाते.
मुलींना देवीचे रूप मानून कन्यापूजन केले जाते, परंतु या दरम्यान काही चुका झाल्या तर त्याचे फळ प्राप्त होत नाही.
म्हणून, कन्यापूजन करताना काही नियमांचे पालन करणे महत्वाचे आहे.
जिथे कन्या पूजन करायचे आहे ती जागा पूर्णतः स्वच्छ आणि शुद्ध पाहिजे.
कन्यांना देवीचे रूप मानले जाते म्हणून त्यांच्याशी आदराने, प्रेमाने व नम्रतेने वागा. कन्या पूजन करताना राग, अहंकार किंवा नकारात्मक विचार मनात ठेवू नका.
कन्या पूजनासाठी नेहमी सात्विक अन्न तयार करावं. शिळं अन्न कन्यांना देणं अशुद्ध मानलं जातं.
मान्यतेनुसार 2, 5, 7 किंवा 9 कन्यांचे पूजन शुभ मानले जाते. 1, 3, 6 किंवा 8 कन्यांचे पूजन टाळावे.
कन्या पूजनानंतर त्यांना आपल्या सामर्थ्यानुसार काहीतरी भेटवस्तू किंवा दक्षिणा द्यावी.
स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा आणि नंतर येणाऱ्या कन्यांचेही हात पाय धुवून त्यांचे स्वागत करा.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.