आंध्र प्रदेशमध्ये भीषण रेल्वे अपघात झाला आहे. दोन ट्रेन एकमेकांवर आदळून मोठी दुर्घटना घडली आहे.



दोन पॅसेंजर ट्रेनची एकमेकांसोबत टक्कर झाली आणि रेल्वेचे तीन डबे घसरले. अलमांडा आणि कंटकपल्ले सेक्शन हा अपघात घडला.



या भीषण रेल्वे अपघातात 14 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यासोबतच या दुर्घटनेत 100 जण जखमी झाले आहेत.



विजियानगरमचे एसपी दीपिका यांनी एएनआयला माहिती देताना सांगितलं की, या अपघातात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला तर 18 जण जखमी झाले.



मिळालेल्या माहितीनुसार, विशाखाहून रायगडाकडे जाणाऱ्या रेल्वेचे डबे कोठावलसा अलमंडा-कंटकपल्ली येथे रुळावरून घसरले.



आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी घटनेची माहिती मिळताच तात्काळ मदतकार्य राबवण्याचे आदेश दिले आहे.



मुख्यमंत्र्यांनी आरोग्य, पोलीस आणि महसूलसह इतर सरकारी विभागांना जखमींना तातडीने वैद्यकीय मदत देण्याचे आदेश दिले आहेत.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर शोक व्यक्त करत संवेदना व्यक्त केल्या. पंतप्रधान मोदींनी मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर केली आहे.



PMNRF कडून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.



पंतप्रधान मोदी यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी संवाद साधला. त्यांना आंध्र प्रदेशातील भीषण रेल्वे अपघातासंदर्भात माहिती घेतली



Thanks for Reading. UP NEXT

'या' देशात एकही साप नाही

View next story