यवतमाळ : वीज जोडणी नसतानाही बिल मात्र 26 हजार रुपये, महावितरणचा गोंधळ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
शेतात वीज जोडणीच नाही, तरीही एका शेतकऱ्याला २६ हजाराचं वीज बील पाठवण्याचा भोंगळ कारभार महावितरणनं केला आहे. यवतमाळमधील अंबादास कापरकर या शेतकऱ्याकडे 2 एकर कोरडवाहू जमीन आहे. त्यांनी शेतात एक बोअवेलही खोदली आहे. त्यासाठी त्यांनी 2013 सालीच महावितरणकडे वीज कनेक्शनसाठी अर्ज केला. मात्र, पाच वर्षे झाली तरीही त्यांना वीज कनेक्शन मिळालेलं नाही. असं असताना महावितरणकडून या शेतकऱ्याला २६ हजाराचं वीज बील पाठवण्यात आलं आहे. दरम्यान, याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारलं असता तांत्रिक चुक झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.