नवी दिल्ली : मोदी सरकारच्या कारभाराला लोकशाही म्हणता येईल का? : रघुराम राजन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतेच दावोसमधल्या आर्थिक परिषदेत भारताच्या विकासाचं जे चित्र रंगवलंय त्यांचे रंग उडवण्याचं काम आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केलं आहे. मोदी सरकारच्या कारभाराला लोकशाही म्हणता येईल का? अशी सरळ सरळ शंका रघुराम राजन यांनी उपस्थित केली आहे. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत मोदींनी दावोसमध्ये केलेल्या वक्तव्यांवर त्यांनी शंका व्यक्त केली. सध्या देशातले सगळे महत्त्वाचे निर्णय केंद्रातल्या मोजक्या लोकांकडून घेतला जाताहेत असा थेट आरोप त्यांनी केला.