Union Budget 2021 | केंद्र सरकारने आर्थिक थापा मारणं बंद केलं पाहिजे, संजय राऊतांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया

Union Budget 2021 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज 2021-2022 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. कोरोना काळात, संपूर्ण देशाला अर्थमंत्र्यांकडून मोठी घोषणा होण्याची अपेक्षा होती. अर्थमंत्र्यांनीही अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा केल्या. विविध क्षेत्रासाठी अर्थमंत्र्यांनी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली. अर्थमंत्री यावेळी म्हणाल्या की, देशाचा अर्थसंकल्प अशा वेळी सादर केला जात आहे, जेव्हा देशाचा जीडीपी दोन वेळा मायनसमध्ये गेला आहे. आर्थिक मंदीचा विचारही केला नव्हता, कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola