Ashish Shelar Full PC : उद्धव ठाकरे कोणत्या बिळात जाऊन बसलेत! आशिष शेलारांची टीका
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAshish Shelar Full PC : उद्धव ठाकरे कोणत्या बिळात जाऊन बसलेत अशी टीका आशिष शेलार यांनी केली. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
उजनी धरणात (Ujani Dam)बोट उलटून बुडाली. यात सहाजण बेपत्ता होते अखेर शोधमोहितमेनंतर पाच जणांचे मृतदेह हाती लागली लागले आहेत. मागील 36 तास या सगळ्यांचा शोध राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (NDRF) जवान घेत होते. अखेर त्यांना यश आलं असून पाच मृतहेद हाती लागले आहेत आणि एका मृतदेहाचा अजूनही शोध सुरु आहे. यात जाधव पती पत्नी गोकूळ जाधव आणि कोमल जाधव व त्यांची दोन लहान मुले आणि एकाचा मृतदेह हाती लागला आहे. हे मृतदेह बाहेर काढून पोस्ट मार्टम करण्यासाठी करमाळा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात येणार आहे. आता एकाचा मृतहेद शोधण्यासाठी पथक कामाला लागलं आहे. त्याचा मृतहेद कधी मिळणार याची प्रतिक्षा आहे.
मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली होती. सगळे एका नातेवाईकाकडे जागरण गोंधळाला जात असताना अचनक वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. त्यावेळी बोट पलटी झाली आणि सगळेच पाण्यात उतरले. बोटीला सावरण्याचा प्रयत्न केला मात्र सुसाट्याच्या वाऱ्यानं पाण्याचा प्रवाह वाढला आणि बोटीत पाणी शिरलं. यावेळी बोटीत सात जण होते. यातील पोलीस असलेल्या डोंगरे यांनी पोहून थेट काढ गाठलं मात्र सहाजण पाण्यात बुडाले. डोंगरे यांनी गावात जाऊन या घटनेची माहिती दिली आणि ही घटना समोर आली. त्यानंतर NDRF पथकाकडून शोध सुरु झाला. तब्बल 15 तास शोध घेतला मात्र मृतदेह सापडले नाही. मात्र त्यानंतरही शोध सुरुच ठेवला अखेर 17 तासांनी बोट सापडली. ही बोट जलाशयाच्या तळाशी 35 फूट खोल पाण्यात आढळून आली होती.