Zero Hour : लातूरच्या ग्रामीण भागात पावसामुळे मोठं नुकसान
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZero Hour : लातूरच्या ग्रामीण भागात पावसामुळे मोठं नुकसान
नैसर्गिक आपत्तींमुळं जर शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान (Damage to crops) झालं तर त्याला सुरक्षा कवच म्हणून पिक विमा ( Crop Insurance) दिला जाते. मात्र, अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना (Farmers) अद्यापही 2023-24 च्या खरीप व रब्बी हंगामातील पिक विम्याची मंजूर रक्कम मिळाली नाही. त्यामुळं स्वतंत्र भारत पक्षाने (Swatantra Bharat Paksh) आणि शेतकरी संघटनेनं आक्रमक भूमिक घेतलीय. शेतकऱ्यांना पिक विमा मिळावा म्हणून पुणे (Pune) येथील कृषी आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. येत्या 9 सप्टेंबर काढण्यात येणाऱ्या मोर्चाला महाराष्ट्र भरातून शेतकरी उपस्थित राहणार असल्याची माहिती स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट (Anil Ghanwat) यांनी दिली.
महाराष्ट्रातील 21 लाख 45 हजार 665 शेतकऱ्यांना अद्याप पिक विम्याची रक्कम मिळाली नाही
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सन 2023-24 च्या खरीप व रब्बी हंगामातील थकीत पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत म्हणून शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. जिल्हा पातळीवर अनेक आंदोलने झाली मात्र खोट्या आश्वासन पलीकडे शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडले नसल्याचे घनवट म्हणाले. महाराष्ट्रातील 21 लाख 45 हजार 665 शेतकऱ्यांना अद्याप पीक विम्याची थकीत रक्कम विमा कंपनीकडून येणे बाकी आहे. ही थकीत रक्कम 2306 कोटी रुपये असून ती सरकारकडून कंपनीला देण्यात आली तरच ती शेतकऱ्यांना वितरित केली जाऊ शकते.