Sanjay Raut | 'औरंगजेब कोणाला प्रिय, हे वागणं सेक्युलर नव्हे'; संजय राऊत यांचे सामनातून रोखठोक बोल
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : सध्या औरंगाबादच्या नांमांतराचा मुद्दा चर्चेत आहे. राज्यातील राजकारणातही यावरुन अनेक राजकीय घडामोडींनी वेग धरला आहे. औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन सत्तेत असलेल्या शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातीलही मतभेद समोर आले आहेत. तसेच विरोधकही महाविकास आघाडी सरकारची या मुद्द्यावरुन कोंडी करत असल्याचं दिसत आहे. अशातच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला सेक्युलरवाद्याच्या मुद्द्यावरून खडे बोल सुनावले आहेत.
औंरगाबादच्या नामांतरावरुन शिवसेनेचा आक्रमक सूर घेतला असून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून काँग्रेसला चिमटा काढला आहे. औरंगाबाद महापालिका निवडणुकांची लगबग सध्या सुरु आहे. अशातच औरंगाबादच्या नामांतराच्या मागणीने जोर धरला आहे. भाजप पाठोपाठ आता शिवसेनेचा सत्तेतील साथीदार असलेल्या काँग्रेसनंही औरंगाबादच्या नामांतराला विरोध केला आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसकडून औंरगाबाद सेक्युलर असल्याचं सांगण्यात आलं होतं. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी, 'औरंगजेब कोणाला प्रिय, हे वागणं सेक्युलर नव्हे' असं म्हणत काँग्रेसवर टिकास्त्र डागलं आहे.