एक्स्प्लोर
Rohit Pawar Interview : Ajit Pawar यांना कुणी घेरलंय? खळबळजनक नावं फोडली, रोहित पवार Exclusive
आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मतदार याद्यांमधील (Voter Lists) घोळ आणि दुबार मतदारांच्या मुद्द्यावरून (Duplicate Voters) निवडणूक आयोग (Election Commission) आणि भाजपवर (BJP) गंभीर आरोप केले आहेत. 'इलेक्शन कमिशन हे स्वायत्त संस्थेसारखे काम न करता भाजपची एक एक्स्ट्रा बॉडी म्हणून काम करतं,' असा थेट हल्लाबोल रोहित पवार यांनी केला. लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या सहा महिन्यांत विधानसभेसाठी ४८ लाख मतदार वाढल्याचा दावा त्यांनी केला, तर भाजप नेते आशिष शेलार यांनी दुबार मतदारांचा मुद्दा मान्य करून एकप्रकारे 'हिट विकेट' घेतली, असेही ते म्हणाले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची (VSI) चौकशी म्हणजे ठाण्यावरचा मोर्चा बारामतीकडे वळवण्याचा भाजपचा डाव आहे, असा आरोपही त्यांनी केला. अजित पवारांबद्दल बोलताना, 'ज्या व्यक्तीत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनण्याचं पोटेंशियल होतं, ते आता दिसत नाही कारण भाजपच त्यांची ताकद कमी करत आहे,' अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















