आरोग्य विभागाने नेमलेल्या कंपनीला विरोध का नाही? सामान्य प्रशासन विभागाकडे बोट दाखवणं योग्य?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppOsmanabad : राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल रात्री ऐन वेळेस आरोग्य विभागात होणारी नोकर भरती गैर व्यवस्थापनाच्या तक्रारी आल्यामुळे रद्द केली. ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्यामुळे परीक्षेसाठी निघालेल्या लाखो विद्यार्थ्यांचे हाल झाले. त्यांची राज्य सरकार विरोधात तीव्र भावना आहे.
या सगळ्यांचा एकच प्रश्न आहे, एवढ्या वर्षांमध्ये सर्वपक्षीय राजकीय नेत्यांच्या आस्थापने खाली आलेल्या राज्य सरकारांना सहज सोप्या आणि पारदर्शी पद्धतीने नोकर भरती करण्यासाठीची परीक्षा यंत्रणा का उभारता आलेली नाही? कालच्या गोंधळाला कोण जबाबदार आहे? ज्या कंपनीबद्दल राजेश टोपे यांनी नाराजी व्यक्त केली ती कंपनी नेमण्यात राजेश टोपे यांच्या आरोग्य विभागाने का विरोध केला नाही? गोंधळानंतर सामान्य प्रशासन विभागाकडे आरोग्य विभागाने बोट दाखवलंय ते योग्य आहे का?