बदलापूर : कानपूर आयआयटीतून बेपत्ता झालेला अक्षय कांबळे तीन महिन्यांनी घरी परतला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Mar 2018 11:12 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कानपूर आयआयटीमधून बेपत्ता झालेला अक्षय कांबळे अखेर ३ महिन्यांनी सुखरूप घरी परतला आहे.काल रात्रीच्या सुमारास अक्षय बदलापूरच्या घरी आला. २९ नोव्हेंबर रोजी अक्षय कानपूरहून मुंबईला यायला निघाला होता. तेव्हापासून अक्षयसोबतचा संपर्क होत नव्हता. नेमकं त्याच्यासोबत काय झालं, हे मात्र अद्याप कळू शकलेलं नाहीय. अक्षय जबरदस्त मानसिक धक्क्यात असून काहीही बोलत नसल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे.