माझा विशेष : फटाक्यांचा फाजिल अट्टाहास कशासाठी?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
राज्यात रहिवासी भागात फटाके विक्रीस मुंबई उच्च न्यायालयाने बंदी घातली. तसंच ज्यांचे विक्री परवाने निवासी भागातले आहेत, त्यांचे परवाने तातडीनं रद्द करण्याचे आदेश हायकोर्टानं दिले आहेत. दिल्लीपाठोपाठ महाराष्ट्रातही फटाकेबंदी होण्याची शक्यता दाट व्हायला लागली आहे. मात्र यावरून आता राजकीय फटकेबाजी व्हायला लागले आहेत. एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या संभाव्य फटाकेबंदीला कडाडून विरोध केलाय तर तिकडे शिवसेनेत यात दोन गट दिसत आहेत. संजय राऊत यांनी या संभाव्य बंदीला विरोध केलाय तर राज्याचे पर्यावरण मंत्री रामदार कदम यांनी याबाबत सकारात्मक सूर आळवला आहे. मात्र या सगळ्या राजकीय फटाक्यांत एका प्रश्नाला बगल दिली जातेय ते म्हणजे फटाक्यांचा फाजिल अटाटाहास कशासाठी.