Zero Hour : राज्यात तिसऱ्या टप्यातलं मतदान, जनतेचा कौल कुणाला? कोण मारणार बाजी ?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZero Hour : राज्यात तिसऱ्या टप्यातलं मतदान, जनतेचा कौल कुणाला? कोण मारणार बाजी ?
राज्यात तिसऱ्या टप्प्यात रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.. जिथं आज घडीला राष्ट्रवादी काँग्रेसचे ३ , भारतीय जनता पक्षाचे ४ आणि शिवसेनेचे ४ खासदार होते.. मात्र, याच भागात शरद पवार आणि अजित पवारांचं... एका अर्थानं राष्ट्रवादीचा मोठा प्रभाव आहे.. कारण, २०१९ साली झालेल्या लोकसभेचा निकाल पाहिला तर राष्ट्रवादीच्या चार पैकी तीन खासदार याच टप्प्यातील मतदारसंघातून आलेत.. त्यामुळे आता होणारा तिसरा टप्पा हा राष्ट्रवादीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा आहे...
मात्र, आजची राजकीय पूर्णपणे स्थिती बदललीय.. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलीय. शरद पवार आणि अजित पवारांनी वाटा वेगळ्या केल्यात.. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सरळ सामना दिसत असला तरी... तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या ११ जागांवर दोन्ही पवारांची प्रतिष्ठा पणाला लागलीय