(Source: ECI / CVoter)
Thackeray Fadnavis Special Report :ठाकरेंना 1999 साली मुख्यमंत्री व्हायचं होतं? फडणवीसांचा आरोप काय?
Thackeray Fadnavis Special Report : मुंबई : उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) 1999 मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Dvendra Fadnavis) केलाय. 1999 मध्ये ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून त्यांनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा दावा देवेंद्र फडणवीसांनी केलाय. तर भाजपला सोडून उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जातील, असे आम्हाला कधीच वाटलं नसल्याचंही फडवीसांनी या मुलाखतीत सांगितलंय. एका मराठी वृत्तपत्राला त्यांनी ही मुलाखत दिली आहे.
फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे आम्हाला म्हणजे भारतीय जनता पक्षाला सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जातील, असे आम्हाला कधीच वाटले नव्हते. आम्ही वैचारीक निष्ठेला अधिक महत्त्व देतो. बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा कसा वागू शकतो यावर आमचा विश्वास होता. परंतु ती आमची सर्वात मोठी चूक होती. बाळासाहेब ठाकरेंविषयीच्या आदरापोटी आम्ही काही गोष्टी समजून देखील काही बोललो नाही. परंतु सत्य आहे की, उद्धव ठाकरेंना युतीची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पडू लागली होती. 1999 मध्येच त्यांना मुख्यमंत्री व्हायचे होते. त्यासाठी त्यांनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले.