Majha Vishesh | काँग्रेस नेत्यांच्या पत्रामागे भाजपचा हात? काँग्रेसला गांधींव्यतिरिक्त अध्यक्ष का नको?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नवी दिल्ली : काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीआधी काँग्रेसच्या 23 नेत्यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रावरुन आधीच वाद निर्माण झाला असताना, आजच्या बैठकीतून बाहेर आलेल्या काही माहितीमुळे याची परिसीमा गाठली. 23 नेत्यांनी पत्र लिहून एकप्रकारे भाजपशी संधान बांधलं, अशा कठोर शब्दात राहुल गांधी यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केल्याचं म्हटलं जात होतं. त्यानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी राहुल गांधींना थेट ट्विटरवर उत्तर दिलं. यामुळे पक्षातील वादविवाद समोर आले. मात्र त्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांना कपिल सिब्बल यांच्या ट्वीटला कोट करु राहुल गांधी यांनी अशाप्रकारचं कोणतंही वक्तव्य केलं नसल्याचं सांगूत मीडियातील चुकीच्या वृत्तांना आणि माहितीला बळी पडू नका, असं आवाहन केलं. मग काही वेळात सिब्बल यांनी राहुल गांधींना उत्तर दिलेलं ट्वीट डिलीट केलं.