एक्स्प्लोर

...तर कसोटी क्रिकेटमधून टॉस बंद होणार?

कसोटी क्रिकेटमध्ये टॉसची परंपरा 141 वर्ष जुनी आहे.

मुंबई : क्रिकेटमध्ये टॉस अर्थात नाणेफेक अतिशय महत्त्वाची समजली जाते. प्रत्येक सामन्याआधी नाणेफेक करुन कोणता संघ पहिल्यांदा फलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण करणार हे ठरवलं जातं. पण कसोटी क्रिकेटमध्ये टॉसची ही 141 वर्षांची जुनी परंपरा बंद करण्याबाबत विचार सुरु आहे. सामन्याआधी होणारा टॉस बंद करण्याचा विचार आयसीसी करत आहे. मुंबईत मे महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या क्रिकेट समितीच्या बैठकीत याबाबत चर्चा होणार आहे. जर यावर सहमती झाली तर 2019 मध्ये सुरु होणाऱ्या जागतिक कसोटी स्पर्धेपासून नाणेफेक बंद केली जाईल. 141 वर्षांची जुनी परंपरा कसोटी क्रिकेटमध्ये टॉसची परंपरा 141 वर्ष जुनी आहे. कसोटी स्पर्धेत यजमान संघाला आपल्याच घरच्या मैदानावर खेळताना फायदा मिळतो, असा तर्क टॉस बंद करण्यामागे लढवला जात आहे. कसोटी क्रिकेटची सुरुवात 1877 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघांमध्ये मेलबर्नच्या एमसीजी ग्राऊंडमधील सामन्यातून झाली होती. तेव्हापासून सामन्याच्या आधी नाणेफेक करुन कोणता संघ पहिल्यांदा फलंदाजी करणार आणि कोण क्षेत्ररक्षण करणार हे ठरवलं जातं. टॉस बंद करण्यामागचा दावा? नाणेफेकदरम्यान यजमान देशाचा कर्णधार नाणं उडवतो आणि त्यानंतर पाहुण्या संघाचा कर्णधार छापा किंवा काटा सांगतो. पण यामुळे यजमान संघाला फायदा मिळतो. यानंतर खराब पीच बनवण्याची प्रकरणं समोर येतात. परिणामी नाणेफेकीचं मूल्य राहत नाही, असा दावा टॉसच्या विरोधात बोलणारे करत आहेत. टॉसऐवजी पाहुण्या संघाला फलंदाजी किंवा क्षेत्ररक्षणाचा पर्याय दिला जाऊ शकतो. त्यामुळे तटस्थ पीच बनण्याची शक्यता जास्त असेल, असा दावा केला जात आहे. आयसीसीच्या क्रिकेट समितीमध्ये कोणाचा समावेश? आयसीसी क्रिकेट समितीमध्ये भारताचे माजी कर्णधार अनिल कुंबळे यांच्याशिवाय अँड्र्यू स्ट्रॉस, महेला जयवर्धने, राहुल द्रविड, टीम मे, न्यूझीलंड क्रिकेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड व्हाईट, अंपायर रिचर्ड केटेलबोरोग, आयसीसी सामनाधिकारी रंजन मदुगले, शॉन पॉलक आणि क्लेरी कोनोर यांचा समावेश आहे. अनिल कुंबळेंच्या अध्यक्षतेखालील या समितीचे काही सदस्य कसोटी क्रिकेटमधून टॉस बंद करण्याच्या बाजूने आहेत. मे महिन्याच्या अखेरीस आयसीसी क्रिकेट समितीची मुंबईत बैठक होणार आहे. पण त्याआधीच कसोटी क्रिकेटमध्ये नाणेफेक बंद करण्याचा विचार सुरु असल्याच्या बातम्या प्रसारित होत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
IND W vs PAK W : भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
Duleep Trophy 2026 : दुलीप ट्रॉफीच्या फायनलआधी मोठा ट्विस्ट; तिलक-वैभवला हिरवा कंदील, पण केएल राहुल OUT; नेमकं काय घडलं?
दुलीप ट्रॉफीच्या फायनलआधी मोठा ट्विस्ट; तिलक-वैभवला हिरवा कंदील, केएल राहुल OUT; नेमकं काय घडलं?
Abhishek Sharma : 13 षटकार, 7 चौकार आणि 135 धावा; अभिषेक शर्माच्या 'त्या' वादळी खेळीने भारताचा टी-20चा इतिहास बदलला, इंग्लंडही हादरलं
13 षटकार, 7 चौकार आणि 135 धावा; अभिषेक शर्माच्या 'त्या' वादळी खेळीने भारताचा टी-20चा इतिहास बदलला, इंग्लंडही हादरलं

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dahihandi 2026 : नवी मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट, घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू, देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना
देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना,घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
Sanjay Raut : ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले... ठाणे फक्त बाळासाहेब ठाकरेंचे, धर्मवीर आनंद दिघेंचे...
ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले...
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
IND W vs PAK W : भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
Embed widget