INDW vs PAKW Womens T20 Worldcup 2024: महिला टी-20 विश्वचषक 2024 ला  (Womens T20 Worldcup 2024) सुरुवात झाली आहे. महिला विश्वचषक 2009 मध्ये सुरू झाला आणि आतापर्यंत या स्पर्धेच्या 8 आवृत्त्या यशस्वीरित्या आयोजित केल्या गेल्या आहेत. गेल्या दीड दशकात अनेक विक्रम मोडीत निघाले असून आता एक भारतीय खेळाडूही इतिहास रचण्याच्या तयारीत आहे.  महिला टी-20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या यादीत पाकिस्तानची निदा दार पहिल्या क्रमांकावर आहे.


पाकिस्तान अव्वल तर भारत तिसऱ्या स्थानावर-


महिला टी-20 क्रिकेटच्या (Womens T20 Worldcup 2024) इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम सध्या पाकिस्तानच्या निदा दारच्या नावावर आहे. निदा दारने 158 सामन्यात एकूण 143 विकेट्स घेतल्या आहेत. तिला 500 पेक्षा जास्त षटके टाकण्याचा आणि 6 पेक्षा कमी इकॉनॉमी रेटने गोलंदाजी करण्याचा अनुभव आहे. सर्वाधिक विकेट्सच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाची मेगन शट दुसऱ्या स्थानावर आहे, जिने आतापर्यंत 140 विकेट्स घेतल्या आहेत.


तिसऱ्या क्रमांकावर भारताची दीप्ती शर्मा-


तिसऱ्या क्रमांकावर भारत आहे कारण दीप्ती शर्माने तिच्या कारकिर्दीत आतापर्यंत 119 सामने खेळून 132 विकेट्स घेतल्या आहेत. टी-20 क्रिकेटच्या इतिहासात काही सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारी दीप्ती शर्मा महिला गोलंदाज बनू शकते. दीप्ती शर्मा व्यतिरिक्त इतर कोणत्याही भारतीय गोलंदाजाला महिला टी-20 क्रिकेटमध्ये 100 बळींचा आकडा गाठता आलेला नाही. दीप्ती शर्मानंतर भारतीयांमध्ये पूनम यादव दुसऱ्या स्थानावर आहे, जिच्या नावावर सध्या 98 विकेट्स आहेत.


महिला टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांची यादी-


निदा दार – 143 विकेट्स


मेगन शट - 140 विकेट्स


दीप्ती शर्मा - 132 विकेट्स


कोण आहे दीप्ती शर्मा?


दीप्ती शर्मा ऑफ-स्पिन गोलंदाजी करते आणि ती अष्टपैलू खेळाडू आहे. टी-20 क्रिकेटमध्ये 132 विकेट्स घेण्यासोबतच तिने क्रिकेटच्या टी-20 फॉरमॅटमध्ये 1,033 धावा केल्या आहेत. दीप्ती शर्माच्या नावावर टी-20 क्रिकेटमध्ये 2 अर्धशतकांचा समावेश आहे.


भारताचा पाकिस्तानविरुद्ध विजय-


अरुंधती रेड्डी, श्रेयांका पाटील यांच्या दमदार गोलंदाजीपुढे नेस्तनाबूत झालेल्या पाकिस्तानला सहा विकेट्सने पराभव करत भारतीय संघाने टी-20 विश्वचषकातील आपला पहिला विजय मिळवला. शेफाली वर्मा आणि कर्णधार हरमनप्रीत सिंग यांनीही फलंदाजीत मोलाचे योगदान देऊन पाकिस्तान गोलंदाजांना फारशी संधी दिली नाही. 19 धावांत 3 विकेट्स घेणारी अरुंधती रेड्डी सामन्याची मानकरी ठरली. 


भारताचे सामने-


4 ऑक्टोबर- भारत विरुद्ध न्यूझीलंड
6 ऑक्टोबर- भारत विरुद्ध पाकिस्तान
9 ऑक्टोबर- भारत विरुद्ध श्रीलंका
12 ऑक्टोबर- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया


संबंधित बातमी:


Ind vs Ban: भारत-बांगलादेश सामन्यात बीसीसीआयने केली मोठी चूक; एका खेळाडूच्या नावावरून प्रचंड गदारोळ