एक्स्प्लोर

Ind vs Sa 3rd ODI : 'तुझीही सेंच्युरी पक्की होती रे....', वनडे मालिकेनंतर विराट कोहलीने अर्शदीपला केलं ट्रोल; व्हिडिओ व्हायरल

टीम इंडियाने विशाखापत्तनममध्ये झालेला निर्णायक वनडे सामना जिंकत दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका आपल्या नावावर केली.

Virat Kohli Savagely Trolls Arshdeep Singh : टीम इंडियाने विशाखापत्तनममध्ये झालेला निर्णायक वनडे सामना जिंकत दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका आपल्या नावावर केली. अखेरच्या सामन्यात भारताने 9 विकेटने सहज विजय मिळवला आणि मालिका 2-1 ने जिंकली. सामन्याचा हिरो यशस्वी जैसवाल, कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा ठरला, तर मालिकेचा सुपरस्टार विराट कोहली राहिला. मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या विराटने अखेरच्या सामन्यातही तुफानी खेळी खेळली. पण बॅटिंगसोबतच कोहलीने आपल्या भन्नाट ट्रोलिंगमुळेही सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आणि त्याचा 'शिकार' अर्शदीप सिंग झाला.

विजयाच्या पाठलागात कोहलीची तडाखेबाज खेळी

टीम इंडियाला विजयासाठी 271 धावांचे लक्ष्य मिळाले होते. यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा याने 155 धावांची दमदार सलामी भागीदारी करत अर्ध्यापेक्षा जास्त काम उरकले. त्यानंतर उरलेल्या धावा कोहलीने वेळ न दवडता सहज पूर्ण केल्या. त्याने नाबाद 65 धावा ठोकत भारताला मालिका विजय मिळवून दिला. मागील दोन सामन्यात सलग शतके झळकावलेल्या विराटकडून या सामन्यातही शतकाची अपेक्षा होती, पण लक्ष्य लहान असल्याने त्याला ते साधता आले नाही.

अर्शदीपच्या प्रश्नावर विराटचा भन्नाट रिप्लाय...

शतकाची हॅट्रिक न जमल्यामुळे प्रेक्षक थोडे निराश झाले असतील. पण अर्शदीप सिंग याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका जिंकल्यानंतर विराट कोहलीसोबत एक मजेशीर रील बनवली. या रीलमध्ये विराटने अर्शदीपला भन्नाट स्टाईलमध्ये ट्रोल केलेलं पाहायला मिळालं. सामन्यानंतर अर्शदीप आपल्या मोबाइलवर रील शूट करू लागला आणि मजेत कोहलीला म्हणाला, “पाजी, रन कम रह गए, सेंच्युरी आज पक्की थी वैसे.” यावर विराटने जे उत्तर दिलं, ते ऐकून अर्शदीपच नाही तर कोणीही फुटून हसू लागला. कोहली म्हणाला की, “टॉस जीत गए, नहीं तो तेरी भी पक्की थी सेंच्युरी में.”

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Arshdeep Singh (@_arshdeep.singh__)

विराटने असा टोमणा का मारला?

खरं म्हणजे, मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत भारत नाणेफेक हरला होता आणि दुसऱ्या डावात बॉलिंग करावी लागली होती. संध्याकाळी वाढलेल्या ओसामुळे भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई झाली होती. मात्र तिसऱ्या सामन्यात भारताने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि त्यामुळे ओसचा त्रास टळला. विराटने हाच मुद्दा मजेशीर पद्धतीने अर्शदीपला आठवण करून दिला आणि त्याच एका ओळीने संपूर्ण माहोल रंगून गेला.

हे ही वाचा :

Team India Next ODI Schedule: दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका संपली; आता रोहित-विराट पुढील वर्षीच भारताच्या जर्सीत दिसणार, संपूर्ण Schedule

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Cricket Schedule 2027: वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीनं सुरुवात,पुढील वर्ष क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, 2027 ठरणार क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
Shreyas Iyer : टीम इंडियाचं विजयाच्या ट्रॅकवर कमबॅक, झिम्बाब्वेवर 7 विकेटनं विजय, श्रेयस अय्यरनं पहिल्या विजयाचं श्रेय कोणाला दिलं?
भारताचा झिम्बाब्वेवर 7 विकेटनं विजय, श्रेयस अय्यरनं पहिल्या विजयाचं श्रेय कोणाला दिलं?
Sachin Tendulkar : 'अपयश आले तरी चालते पण गैरमार्ग स्वीकारणं योग्य नाही', सचिन तेंडुलकरची वडिलांची शिकवण सांगत विद्यार्थी आंदोलनावर पोस्ट
'अपयश आले तरी चालते पण गैरमार्ग स्वीकारणं योग्य नाही', सचिन तेंडुलकरची वडिलांची शिकवण सांगणारी पोस्ट
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  

व्हिडीओ

Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmendra Pradhan: राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये याच विचाराने माझा राजीनामा पंतप्रधानांकडे दिला; धर्मेंद्र प्रधानांची राजीनाम्यावर प्रतिक्रिया
राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये याच विचाराने माझा राजीनामा पंतप्रधानांकडे दिला : धर्मेंद्र प्रधान
NEET Exam Protest: एनडीए सरकारमधील मंत्र्याची मुलगी विद्यार्थी आंदोलनात उतरली, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी अन् थेट मोदींविरोधात घोषणाबाजी
एनडीए सरकारमधील मंत्र्याची मुलगी विद्यार्थी आंदोलनात उतरली, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी अन् थेट मोदींविरोधात घोषणाबाजी
Bihar Student Protest: 'पेपर चोर, गद्दी छोड..' दिल्ली, महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये विद्यार्थ्याचं आंदोलन पेटलं; सिवानमध्ये 10 राऊंड फायरिंग, 8 जिल्ह्यात दगडफेक, बंदला हिंसक वळण
'पेपर चोर, गद्दी छोड..' दिल्ली, महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये विद्यार्थ्याचं आंदोलन पेटलं; सिवानमध्ये 10 राऊंड फायरिंग, 8 जिल्ह्यात दगडफेक, बंदला हिंसक वळण
NEET Maharashtra Protest: वर्षा बंगल्यावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात, मंत्रालय परिसरात कडक सुरक्षा; मुख्यमंत्री, मंत्री, आमदारांच्या सुरक्षेत वाढ, निवासस्थानी सुद्धा बंदोबस्त; सरकारच्या निर्णयावर संजय राऊतांची खोचक टिप्पणी
वर्षा बंगल्यावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात, मंत्रालय परिसरात कडक सुरक्षा; मुख्यमंत्री, मंत्री, आमदारांच्या सुरक्षेत वाढ, निवासस्थानी सुद्धा बंदोबस्त; सरकारच्या निर्णयावर संजय राऊतांची खोचक टिप्पणी
Abhijeet Dipke on PM Modi: दिल्ली पोलिसांनी खाकी वर्दी उतरवून RSSची हाफ चड्डी घालावी, अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल; धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नसल्यास 20 जुलैपेक्षा मोठ्या मोर्चाचा इशारा
दिल्ली पोलिसांनी खाकी वर्दी उतरवून RSSची हाफ चड्डी घालावी, अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल; धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नसल्यास 20 जुलैपेक्षा मोठ्या मोर्चाचा इशारा
Nashik Palghar Earthquake: नाशिक, पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; सुरगाण्यात एकापाठोपाठ चार हादरे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
नाशिक, पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; सुरगाण्यात एकापाठोपाठ चार हादरे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Mumbai Rain Water: दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
'आपलं काम सोडून सगळं काही करतात महामानवजी, मोदीजी आपण काय बोलतो हे नेहमी विसरतात...' सीजेपीनं पेपर लीकवरून 27 जुलै 2023 पासून ते संसदेतील 2 जुलै 2024 पर्यंत मोदींची भाषणेच दाखवली
'आपलं काम सोडून सगळं काही करतात महामानवजी, मोदीजी आपण काय बोलतो हे नेहमी विसरतात...' सीजेपीनं पेपर लीकवरून 27 जुलै 2023 पासून ते संसदेतील 2 जुलै 2024 पर्यंत मोदींची भाषणेच दाखवली
Embed widget