एक्स्प्लोर

Womens World Cup 2025 Semifinal Qualification : सेमीफायनलमध्ये एका टीमची जागा पक्की, उरलेल्या 3 जागांसाठी चढाओढ, टीम इंडियासाठी गणित झालं गुंतागुंतीचं, जाणून घ्या समीकरण

Australia Qualify Womens World Cup 2025 Semifinal : भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या महिला वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत पहिली सेमीफायनलिस्ट टीम निश्चित झाली आहे.

Women’s World Cup 2025 Semifinal Scenario Team India : भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या महिला वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत पहिली सेमीफायनलिस्ट टीम निश्चित झाली आहे. सात वेळा विजेतेपद मिळवलेल्या ऑस्ट्रेलिया (Australia Qualify Womens World Cup 2025 Semifinal) संघाने सलग पाच सामने जिंकत सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के केले. पॉइंट्स टेबलवर त्यांच्या नावासमोर आता “Q" म्हणजेच पात्र लिहिले गेले आहे. मात्र, यामुळे उरलेल्या 3 जागांसाठी चढाओढ सुरू झाली आहे, ज्यामध्ये टीम इंडियासाठी गणित गुंतागुंतीचं झालं आहे. 

ऑस्ट्रेलिया सेमीफायनलमध्ये, तर....

पॉइंट्स टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी आहे आणि त्यांचा सेमीफायनल प्रवास निश्चित झाला आहे. दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंड असून, त्यांना उरलेल्या तीन सामन्यांपैकी फक्त एक विजय मिळवला तरी सेमीफायनलची तिकिटं मिळणार आहेत. तिसऱ्या क्रमांकावर आहे दक्षिण आफ्रिका, ज्यांनी चार पैकी तीन सामने जिंकले असून त्यांचे सहा गुण झाले आहेत. भारत सध्या चौथ्या क्रमांकावर आहे.

टीम इंडियासाठी समीकरण झालं गुंतागुंतीचं

भारतीय संघाने आतापर्यंत चार सामने खेळले आहेत, त्यापैकी दोन जिंकले आणि दोन हरले आहेत. आता टीम इंडियासमोर इंग्लंड, न्यूझीलंड आणि बांगलादेश हे तीन सामने उरले आहेत. 19 ऑक्टोबरला इंग्लंडविरुद्धचा सामना निर्णायक ठरणार आहे. या सामन्यात पराभव झाल्यास भारताची सेमीफायनलची आशा धोक्यात येऊ शकते.

दक्षिण आफ्रिका अन् इंग्लंडची जागा जवळपास पक्की

दक्षिण आफ्रिकेला अजून श्रीलंका, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्याशी खेळायचे आहे. या तिन्हीपैकी फक्त एक सामना जिंकला तरी ते अंतिम चारमध्ये पोहोचतील. इंग्लंडलाही फक्त एका विजयाची गरज आहे, त्यांचे उरलेले सामने भारत, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियानंतर इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांच्या सेमीफायनलमध्ये जाण्याची शक्यता जास्त आहे.

भारतासाठी आता ‘करो या मरो’ परिस्थिति, न्यूझीलंडचा धोका का?

भारताला उरलेले तीनपैकी दोन सामने जिंकणे अत्यावश्यक आहे, विशेषतः इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्ध. न्यूझीलंडच भारतासाठी सगळ्यात मोठा धोका ठरू शकतो. न्यूझीलंडने आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. एक जिंकला, दोन हरले आणि एक सामना पावसामुळे रद्द झाला, त्यामुळे त्यांचे 3 गुण आहेत. आता त्यांचे उरलेले सामने पाकिस्तान, भारत आणि इंग्लंडविरुद्ध आहेत. जर न्यूझीलंडने उरलेले तिन्ही सामने जिंकले, किंवा भारताने इंग्लंड आणि न्यूझीलंड दोघांविरुद्ध पराभव पत्करला, तर भारताला सेमीफायनलच्या रेसमधून बाहेर पडावे लागू शकते. म्हणून भारताला केवळ स्वतःचे सामने जिंकणेच नाही, तर न्यूझीलंड हरावा अशी प्रार्थना देखील करावी लागणार आहे.

हे ही वाचा -

Bangladesh Players Vehicles Attacked After ODI Series : बांगलादेशी खेळाडूंच्या गाड्यांवर हल्ला, लाजिरवाण्या पराभवानंतर एअरपोर्टवर नेमकं काय घडलं? क्रिकेटरने सांगितला थरारक प्रसंग

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Meenakshi Shinde : मिनाक्षी शिंदेंच्या विरोधात आगरी समाज आक्रमक, ज्याला कॉल केला आणि ज्याला शिव्या दिल्या ते दोघेही पोलीस ठाण्यात
मिनाक्षी शिंदेंच्या विरोधात आगरी समाज आक्रमक, ज्याला कॉल केला आणि ज्याला शिव्या दिल्या ते दोघेही पोलीस ठाण्यात
WPL 2026 : डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच लढतीत प्रेक्षकांचे पैसे वसूल, अटीतटीच्या लढतीत स्मृती मानधनाच्या बंगळुरुचा मुंबईवर विजय
डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच लढतीत बंगळुरुचा विजय, मुंबईचा अटीतटीच्या लढतीत पराभव
Uddhav Thackeray : समोरच्या उमदेवारानं अर्ज मागं घ्यावा म्हणून अधिकाराचा दुरुपयोग करणारा राहुल नार्वेकर निवडणूक आयोगाला चालून जातो : उद्धव ठाकरे
नाशिकच्या प्रचारसभेत घराणेशाहीच्या मुद्यावरुन भाजपला प्रत्युत्तर, राहुल नार्वेकरांचं नाव घेत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
Tilak Varma: तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत
Ambadas Danve On MIM : इम्तियाज जलील भाजपचा हस्तक, त्याने शहराला व्यसन लावलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Meenakshi Shinde : मिनाक्षी शिंदेंच्या विरोधात आगरी समाज आक्रमक, ज्याला कॉल केला आणि ज्याला शिव्या दिल्या ते दोघेही पोलीस ठाण्यात
मिनाक्षी शिंदेंच्या विरोधात आगरी समाज आक्रमक, ज्याला कॉल केला आणि ज्याला शिव्या दिल्या ते दोघेही पोलीस ठाण्यात
WPL 2026 : डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच लढतीत प्रेक्षकांचे पैसे वसूल, अटीतटीच्या लढतीत स्मृती मानधनाच्या बंगळुरुचा मुंबईवर विजय
डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच लढतीत बंगळुरुचा विजय, मुंबईचा अटीतटीच्या लढतीत पराभव
Uddhav Thackeray : समोरच्या उमदेवारानं अर्ज मागं घ्यावा म्हणून अधिकाराचा दुरुपयोग करणारा राहुल नार्वेकर निवडणूक आयोगाला चालून जातो : उद्धव ठाकरे
नाशिकच्या प्रचारसभेत घराणेशाहीच्या मुद्यावरुन भाजपला प्रत्युत्तर, राहुल नार्वेकरांचं नाव घेत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
Tilak Varma: तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
Tata : टाटा कंपनीच्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांनी केलं मालामाल, 20 वर्षात 1 लाखांचे बनले 1 कोटी, जाणून घ्या
टाटा कंपनीच्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांनी केलं मालामाल, 20 वर्षात 1 लाखांचे बनले 1 कोटी, जाणून घ्या
Share Market : अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?
काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?
Ambernath : अंबरनाथ नगरपरिषदेवर भगवा फडकणार, राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा, बहुमताचा आकडा पार
अंबरनाथ नगरपरिषदेवर भगवा फडकणार, राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा, बहुमताचा आकडा पार
Embed widget