एक्स्प्लोर

Womens World Cup 2025 Semifinal Qualification : सेमीफायनलमध्ये एका टीमची जागा पक्की, उरलेल्या 3 जागांसाठी चढाओढ, टीम इंडियासाठी गणित झालं गुंतागुंतीचं, जाणून घ्या समीकरण

Australia Qualify Womens World Cup 2025 Semifinal : भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या महिला वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत पहिली सेमीफायनलिस्ट टीम निश्चित झाली आहे.

Women’s World Cup 2025 Semifinal Scenario Team India : भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या महिला वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत पहिली सेमीफायनलिस्ट टीम निश्चित झाली आहे. सात वेळा विजेतेपद मिळवलेल्या ऑस्ट्रेलिया (Australia Qualify Womens World Cup 2025 Semifinal) संघाने सलग पाच सामने जिंकत सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के केले. पॉइंट्स टेबलवर त्यांच्या नावासमोर आता “Q" म्हणजेच पात्र लिहिले गेले आहे. मात्र, यामुळे उरलेल्या 3 जागांसाठी चढाओढ सुरू झाली आहे, ज्यामध्ये टीम इंडियासाठी गणित गुंतागुंतीचं झालं आहे. 

ऑस्ट्रेलिया सेमीफायनलमध्ये, तर....

पॉइंट्स टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी आहे आणि त्यांचा सेमीफायनल प्रवास निश्चित झाला आहे. दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंड असून, त्यांना उरलेल्या तीन सामन्यांपैकी फक्त एक विजय मिळवला तरी सेमीफायनलची तिकिटं मिळणार आहेत. तिसऱ्या क्रमांकावर आहे दक्षिण आफ्रिका, ज्यांनी चार पैकी तीन सामने जिंकले असून त्यांचे सहा गुण झाले आहेत. भारत सध्या चौथ्या क्रमांकावर आहे.

टीम इंडियासाठी समीकरण झालं गुंतागुंतीचं

भारतीय संघाने आतापर्यंत चार सामने खेळले आहेत, त्यापैकी दोन जिंकले आणि दोन हरले आहेत. आता टीम इंडियासमोर इंग्लंड, न्यूझीलंड आणि बांगलादेश हे तीन सामने उरले आहेत. 19 ऑक्टोबरला इंग्लंडविरुद्धचा सामना निर्णायक ठरणार आहे. या सामन्यात पराभव झाल्यास भारताची सेमीफायनलची आशा धोक्यात येऊ शकते.

दक्षिण आफ्रिका अन् इंग्लंडची जागा जवळपास पक्की

दक्षिण आफ्रिकेला अजून श्रीलंका, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्याशी खेळायचे आहे. या तिन्हीपैकी फक्त एक सामना जिंकला तरी ते अंतिम चारमध्ये पोहोचतील. इंग्लंडलाही फक्त एका विजयाची गरज आहे, त्यांचे उरलेले सामने भारत, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियानंतर इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांच्या सेमीफायनलमध्ये जाण्याची शक्यता जास्त आहे.

भारतासाठी आता ‘करो या मरो’ परिस्थिति, न्यूझीलंडचा धोका का?

भारताला उरलेले तीनपैकी दोन सामने जिंकणे अत्यावश्यक आहे, विशेषतः इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्ध. न्यूझीलंडच भारतासाठी सगळ्यात मोठा धोका ठरू शकतो. न्यूझीलंडने आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. एक जिंकला, दोन हरले आणि एक सामना पावसामुळे रद्द झाला, त्यामुळे त्यांचे 3 गुण आहेत. आता त्यांचे उरलेले सामने पाकिस्तान, भारत आणि इंग्लंडविरुद्ध आहेत. जर न्यूझीलंडने उरलेले तिन्ही सामने जिंकले, किंवा भारताने इंग्लंड आणि न्यूझीलंड दोघांविरुद्ध पराभव पत्करला, तर भारताला सेमीफायनलच्या रेसमधून बाहेर पडावे लागू शकते. म्हणून भारताला केवळ स्वतःचे सामने जिंकणेच नाही, तर न्यूझीलंड हरावा अशी प्रार्थना देखील करावी लागणार आहे.

हे ही वाचा -

Bangladesh Players Vehicles Attacked After ODI Series : बांगलादेशी खेळाडूंच्या गाड्यांवर हल्ला, लाजिरवाण्या पराभवानंतर एअरपोर्टवर नेमकं काय घडलं? क्रिकेटरने सांगितला थरारक प्रसंग

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Shreyas Iyer : टीम इंडियाचं विजयाच्या ट्रॅकवर कमबॅक, झिम्बाब्वेवर 7 विकेटनं विजय, श्रेयस अय्यरनं पहिल्या विजयाचं श्रेय कोणाला दिलं?
भारताचा झिम्बाब्वेवर 7 विकेटनं विजय, श्रेयस अय्यरनं पहिल्या विजयाचं श्रेय कोणाला दिलं?
Sachin Tendulkar : 'अपयश आले तरी चालते पण गैरमार्ग स्वीकारणं योग्य नाही', सचिन तेंडुलकरची वडिलांची शिकवण सांगत विद्यार्थी आंदोलनावर पोस्ट
'अपयश आले तरी चालते पण गैरमार्ग स्वीकारणं योग्य नाही', सचिन तेंडुलकरची वडिलांची शिकवण सांगणारी पोस्ट
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Vaibhav Sooryavanshi : अभिषेक शर्मा पुन्हा फ्लॉप, वैभव सूर्यवंशीनं हरारेचं मैदान गाजवलं, बेबी बॉसचं झिम्बाब्वे विरुद्ध वादळी अर्धशतक 
अभिषेक शर्मा पुन्हा फ्लॉप, वैभव सूर्यवंशीनं हरारेचं मैदान गाजवलं,झिम्बाब्वेमध्ये बेबी बॉसची वादळी फलंदाजी

व्हिडीओ

Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: सरकार म्हणाले, पेलेट गनचा वापर केला नाही; राहुल गांधींनी तिरंगा हातात असताना गंभीर जखमी झालेल्या 19 वर्षीय साहिलच्या टी शर्ट वर करून जखमा दाखवल्या, डोळा सुद्धा गेला, पोलिस भरतीचं होतं स्वप्न
Video: सरकार म्हणाले, पेलेट गनचा वापर केला नाही; राहुल गांधींनी तिरंगा हातात असताना गंभीर जखमी झालेल्या 19 वर्षीय साहिलच्या टी शर्ट वर करून जखमा दाखवल्या, डोळा सुद्धा गेला, पोलिस भरतीचं होतं स्वप्न
JP Nadda on CJP Meeting : 3 पैकी 2 मागण्यांवर सरकार सकारात्मक; पण CJP धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम, बैठक संपताच जे.पी. नड्डा म्हणाले...
3 पैकी 2 मागण्यांवर सरकार सकारात्मक; पण CJP धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम, बैठक संपताच जे.पी. नड्डा म्हणाले...
नीट परीक्षेच्या दुसऱ्या निकालात मुलीला अवघे 200 गुण, वडिलांना ह्रदयविकाराचा झटका; लेकीचा सरकारला सवाल
नीट परीक्षेच्या दुसऱ्या निकालात मुलीला अवघे 200 गुण, वडिलांना ह्रदयविकाराचा झटका; लेकीचा सरकारला सवाल
Pune Crime News: पुण्यात पोलिस चौकीसमोरच गोळीबार; पूर्व वैमन्यासातून तरुणावर फायरिंग, अवघ्या २० मिनिटात आरोपीला घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
पुण्यात पोलिस चौकीसमोरच गोळीबार; पूर्व वैमन्यासातून तरुणावर फायरिंग, अवघ्या २० मिनिटात आरोपीला घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
RBI : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला आरबीआयकडून 13.30 लाखांचा दंड, RBI नं सहा बँकांना ठोठावला आर्थिक दंड
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला आरबीआयकडून 13.30 लाखांचा दंड, RBI नं सहा बँकांना ठोठावला आर्थिक दंड
Sonam Wangchuk React On Dharmendra Pradhan Resignation: धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्याने मुलांचे नुकसान होणार नाही; माझ्याकडे फक्त 2 पर्याय होते, सोनम वांगचुक काय काय म्हणाले?
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्याने मुलांचे नुकसान होणार नाही; माझ्याकडे फक्त 2 पर्याय होते, सोनम वांगचुक काय काय म्हणाले?
शिक्षण सचिवांची बदली करत पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली ज्यांच्यावर कित्येक कोटींच्या गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप, हा देशातील तरुणांचा अपमान, अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
शिक्षण सचिवांची बदली करत पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली ज्यांच्यावर कित्येक कोटींच्या गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप, हा देशातील तरुणांचा अपमान, अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
कॉकरोच पार्टीच्या प्रवक्त्यांची जेपी नड्डांसोबत बैठक, 3 प्रमुख मागण्या; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत काय ठरलं?
कॉकरोच पार्टीच्या प्रवक्त्यांची जेपी नड्डांसोबत बैठक, 3 प्रमुख मागण्या; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत काय ठरलं?
Embed widget