Womens Asia Cup 2024, Team India: बीसीसीआयने महिला आशिया कपसाठी (Womens Asia Cup) भारतीय संघाची (Womens Team India) घोषणा केली आहे. ही स्पर्धा 19 जुलैपासून सुरू होत आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात 15 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. खरे तर भारताने आतापर्यंत विक्रमी 7 वेळा आशिया जिंकले आहे. अशा प्रकारे टीम इंडिया आठव्यांदा आशिया कप जिंकण्याच्या इराद्याने उतरणार आहे. आशिया कपमध्ये भारतीय संघाची कमान अनुभवी हरमनप्रीत कौरच्या हाती असेल. याशिवाय दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेत उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या स्मृती मंधानाला उपकर्णधारपद देण्यात आले आहे.


आशिया कपसाठी भारतीय संघ-


हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), उमा छेत्री (विकेटकीपर), पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, दयालन हेमलता, आशा शोभना. , राधा यादव, श्रेयंका पाटील आणि सजना सजीवन.


राखीव खेळाडू-


श्वेता सेहरावत, सायका इशाक, तनुजा कंवर आणि मेघना सिंग


भारतीय संघ ग्रुप-अ मध्ये-


हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला ग्रुप-ए मध्ये ठेवण्यात आले आहे. भारताव्यतिरिक्त या गटात पाकिस्तान, संयुक्त अरब अमिराती आणि नेपाळचा समावेश आहे. भारत आणि पाकिस्तान 19 जुलैला आमनेसामने येणार आहेत. यानंतर भारत आणि संयुक्त अरब अमिरातीचे संघ 21 जुलैला आमनेसामने येतील. तर भारत आणि नेपाळ यांच्यात 23 जुलै रोजी सामना होणार आहे. भारतीय संघ आपले सर्व सामने डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळणार आहे.


प्रथमच 2024 मध्ये आशिया कपचे आयोजन-


2004 मध्ये प्रथमच महिला आशिया कपचे आयोजन करण्यात आले होते. आतापर्यंत ही स्पर्धा 8 वेळा आयोजित करण्यात आली आहे. ज्यामध्ये भारतीय संघाने विक्रमी 7 वेळा ट्रॉफी जिंकली आहे. तर बांगलादेश एकदाच चॅम्पियन झाला आहे. भारत आणि बांगलादेश वगळता इतर संघांना ट्रॉफी जिंकण्यात यश आलेले नाही.


टीम इंडियाच्या सामन्यांचं वेळापत्रक


भारत विरुद्ध पाकिस्तान, संध्याकाळी 7 वाजता


भारत विरुद्ध यूएई, दुपारी 2 वाजता


भारत विरुद्ध नेपाळ, संध्याकाळी 7 वाजता


सेमी फायनल 26 जुलै


फायनल 28 जुलै


संबंधित बातम्या:


'टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी अन् WTC जिंकणार; जय शाह यांचं मोठं विधान


Ind vs Zim T20: 'अहंकाराला पायबंद बसला...'; टीम इंडियाचा झिम्बाब्वेविरुद्ध पराभव झाल्यानंतर शशी थरुर यांचं ट्विट


अत्यंत लाजिरवाणी, खराब फलंदाजी, काहीतरी चुकतंय…; झिम्बाब्वेविरुद्ध पराभव झाल्यानंतर शुभमन गिल संतापला