नवी दिल्ली : टी 20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup 2024) सुपर 8 च्या लढती निश्चित झाल्या आहेत. भारतीय क्रिकेट संघानं (Team India) आणि अमेरिकनं अ गटातून सुपर 8 मध्ये प्रवेश कला आहे. अ गटात असलेल्या पाकिस्तानला (Pakistan) स्पर्धेतून बाहेर जावं लागलं आहे. पाकिस्तानला अखेरच्या मॅचमध्ये आयरलँड विरुद विजय मिळवण्यासठी संघर्ष करावा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. टी 20 वर्ल्ड कपमधून पहिल्या फेरीतून बाहेर पडलेल्या पाकिस्तानबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पाकिस्तानच्या संघात एकता नव्हती. बाबर आझम (Babar Azam) आणि शाहीन आफ्रिदी यांच्यात संवाद नव्हता,असे दावे केले जात आहेत. काही जणांना बाबर आझमला पाकिस्तानचं कॅप्टन पद सोडण्याचा सल्ला दिला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू आणि बीसीसीआयच्या निवड समितीचे माजी प्रमुख के. श्रीकांत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. बाबर आझमनं टी 20 क्रिकेट खेळू नये, असा कठोर सल्ला के. श्रीकांत यांनी दिला आहे. 


 


टीम इंडियाचे माजी निवड समिती प्रमुख के. श्रीकांत यांनी बाबर आझमला कॅप्टनपद नव्हे या प्रकारात क्रिकेट खेळणं सोडावं असा सल्ला दिला आहे. टी 20 क्रिकेट सारख्या वेगवान फॉरमॅटमध्ये तुम्ही नेहमी टुक टुक करु शकत नाही, असं श्रीकांत म्हणाले. त्यांनी बाबर आझमच्या स्ट्राईक रेटवर देखील प्रश्न उपस्थित केले. 


 
के. श्रीकांत यांनी स्टार स्पोर्टस बोलताना म्हटलं की " बाबर आझमनं टी 20 क्रिकेट खेळावं असं वाटत नाही. तो एक चांगला कसोटी क्रिकेटर असेल. मात्र, मला वाटतं की त्यानं टी  20 क्रिकेट खेळू नये. माझं मत आहे तुम्ही टी 20 क्रिकेटमध्ये नेहमी टुक टुक करु शकत नाही",असं श्रीकांत म्हणाले. 



के. श्रीकांत पुढे म्हणाले की तुम्ही आकड्यांबाबत जेव्हा बोलता त्यावेळी ते बाबर विराट कोहली आणि रोहित शर्मानं 4 हजार धावा केल्याचं सांगतात. मात्र, बाबर आझमचा स्ट्राईक रेट 112-115 इतका आहे. तुम्ही कुणाबाबत बोलताय, अस सवाल के. श्रीकांत यांनी केला. 


पाकिस्तान सुपर 8 मधून बाहेर


पाकिस्तानला टी 20 वर्ल्ड कपमध्ये अमेरिकेकडून सुपर ओव्हरमध्ये तर भारताकडून 6  धावांनी पराभव स्वीकारला होता. यानंतरही पाकिस्तानच्या सुपर 8 च्या आशा कायम होत्या. मात्र, आयरलँड विरुद्ध अमेरिका मॅच पावसानं रद्द झाली. त्यामुळं अमेरिकेला फायदा मिळाला आणि ते सुपर 8 मध्ये गेले. तर, कॅनडा आणि आयरलँडला पराभूत करुनही पाकिस्तान क्रिकेट संघाला घरचा रस्ता धरावा लागला. 


संबंधित बातम्या : 


Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...


T20 World Cup 2024 : अखेर सुपर 8 मधील सर्व संघ ठरले, भारताचे सामने कोणत्या दिवशी, एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक