एक्स्प्लोर

Mumbai Indians Playoffs Scenario IPL 2026 : पाचवेळा चॅम्पियन, पण आता मिशन इम्पॉसिबल...; प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी मुंबई इंडियन्ससमोर एकच अट, जाणून घ्या समीकरण

Mumbai Indians Playoffs Qualification Scenario IPL 2026 : मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल 2026 मध्ये परिस्थिती सध्या काहीशी चिंताजनक दिसत आहे.

Mumbai Indians Playoffs Qualification Scenario IPL 2026 : मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल 2026 मध्ये परिस्थिती सध्या काहीशी चिंताजनक दिसत आहे. पाच वेळा किताब जिंकलेल्या या संघाने यंदाच्या हंगामाची सुरुवात दमदार विजयाने केली होती. वानखेडे मैदानावर पहिल्या सामन्यातील पराभवाची परंपराही त्यांनी मोडली होती. मात्र त्यानंतर संघाची गाडी रुळावरून घसरली आणि सलग चार पराभवांना सामोरे जावे लागले. आता या स्थितीत संघासमोर पुढची वाट खडतर दिसत आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी मुंबई इंडियन्सला जोरदार पुनरागमन करणे अत्यावश्यक आहे.

पण, या संघाचा इतिहास पाहिला तर अशा कठीण परिस्थितीतूनही त्यांनी जबरदस्त कमबॅक केले आहे. याआधीही खराब स्थितीतून उभारी घेत त्यांनी किताब पटकावला आहे. त्यामुळे यंदाही चाहत्यांना तसाच चमत्कार पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे. सध्याच्या प्लेऑफ समीकरणाचा विचार केला, तर मार्ग कठीण असला तरी अशक्य नाही. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 5 सामने खेळले असून प्रत्येक संघाला लीग टप्प्यात 14 सामने खेळायचे आहेत. म्हणजेच मुंबईकडे अजून 9 सामने शिल्लक आहेत आणि याच सामन्यांमध्ये त्यांना विजयाची मालिका सुरू करावी लागणार आहे.

मुंबई अजूनही प्लेऑफमध्ये जाऊ शकते? (Mumbai Indians Playoffs Qualification Scenario IPL 2026)

मुंबई इंडियन्सबद्दल बोलायचे झाल्यास, पाच सामन्यांनंतर संघाकडे सध्या फक्त 2 गुण आहेत. ते गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहेत. सलग चार पराभवांनंतर, संघाच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या शक्यता अधिकच कठीण झाल्या आहेत. गेल्या काही हंगामांमध्ये, प्लेऑफसाठी पात्र ठरण्याकरिता 16 गुणांचा जादुई आकडा राहिला आहे. त्यामुळे, जर मुंबईला 16 गुणांपर्यंत पोहोचायचे असेल, तर त्यांना त्यांच्या उर्वरित 9 सामन्यांपैकी किमान 7 सामने जिंकावे लागतील.

याचा अर्थ असा की, मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी पहिली आवश्यक अट म्हणजे त्यांच्या उर्वरित 9 सामन्यांपैकी 7 सामने जिंकून 16 गुणांपर्यंत पोहोचणे. दरम्यान, जर पावसामुळे एखादा सामना रद्द झाला, तर संघाच्या मार्गात अडथळा येऊ शकतो. त्यामुळे, जर मुंबईने 9 पैकी किमान 8 सामने जिंकण्याचे ध्येय ठेवले, तर ते सुरक्षित मानले जाऊ शकते. त्यामुळे, संघाचा मार्ग कठीण वाटतो.

मुंबईची अलीकडील कामगिरी पाहता, त्यांच्या उर्वरित 9 सामन्यांपैकी 8 किंवा 7 सामने जिंकणे कठीण वाटते. या संघात स्टार खेळाडूंची कमतरता नाही. रोहित शर्मा जखमी आहे, पण त्याचा बदली खेळाडू क्विंटन डी कॉकनेही शतक झळकावले आहे. जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट निष्प्रभ ठरले आहेत. सूर्या आणि तिलकही आपली कामगिरी बजावण्यात अपयशी ठरले आहेत. याचा अर्थ असा की, जर या संघाला प्लेऑफमध्ये पोहोचायचे असेल, तर अपयशी ठरलेल्या खेळाडूंनाच हिरो बनावे लागेल.
 
मुंबई इंडियन्सच्या पहिल्या 5 सामन्यांचे निकाल (Mumbai Indians IPL 2026)

केकेआर विरुद्ध : 6 गडी राखून विजय
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध : 6 गडी राखून पराभव
राजस्थान रॉयल्स विरुद्ध : 27 धावांनी पराभव
आरसीबी विरुद्ध : 18 धावांनी पराभव
पंजाब किंग्स विरुद्ध : 7 गडी राखून पराभव

मुंबई इंडियन्सच्या उर्वरित 9 सामन्यांचे वेळापत्रक

सामना 30 : गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, 20 एप्रिल (अहमदाबाद)
सामना 33 : मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, 23 एप्रिल (मुंबई)
सामना 41 : मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, 29 एप्रिल (मुंबई)
सामना 44 : चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, 2 मे (चेन्नई)
सामना 47 : मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, 4 मे (मुंबई)
सामना 54 : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स, 10 मे (रायपूर)
सामना 58 : पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, 14 मे (धर्मशाला)
सामना 65 : कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, 20 मे (कोलकाता)
सामना 69 : मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, 24 मे (मुंबई)

हे ही वाचा -

MI vs PBKS Preity Zinta : मुंबईविरुद्ध सामना जिंकताच प्रिती झिंटाने एका फोटोमधून न बोलता सगळं सांगितलं; पंजाबच्या मालकीनची पोस्ट व्हायरल

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Suryakumar Yadav News : भारताचा विजेता कर्णधार कायमचा OUT! सूर्यावर BCCIची मोठी कारवाई, कर्णधारपद गेले, संघातूनही बाहेर, अजित आगरकर काय म्हणाले?
भारताचा विजेता कर्णधार कायमचा OUT! सूर्यावर BCCIची मोठी कारवाई, कर्णधारपद गेले, संघातूनही बाहेर, अजित आगरकर काय म्हणाले?
India Squad for Asian Games 2026 : टीम इंडियामधून 11 खेळाडू OUT, बीसीसीआयने भाकरी नव्हे अख्खा तवाच फिरवला! एशियन गेम्ससाठी संघ जाहीर; पाहा चक्रावणारा Squad
टीम इंडियामधून 11 खेळाडू OUT, बीसीसीआयने भाकरी नव्हे अख्खा तवाच फिरवला! एशियन गेम्ससाठी संघ जाहीर; पाहा चक्रावणारा Squad
Team India T20I Squads : मोठी बातमी : BCCI चे तीन तगडे निर्णय, थेट कॅप्टन बदलला, सूर्यकुमार यादव टी-20 संघातून बाहेर, वैभव सूर्यवंशीची निवड
मोठी बातमी : BCCI चे तीन तगडे निर्णय, थेट कॅप्टन बदलला, सूर्यकुमार यादव टी-20 संघातून बाहेर, वैभव सूर्यवंशीची निवड
Team India T20I Squads : BCCI कडून आयर्लंड अन् इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा; श्रेयस अय्यर कर्णधार, तर 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला संधी; वाचा 15 खेळाडूंचा खतरनाक Squads
BCCI कडून आयर्लंड अन् इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा; श्रेयस अय्यर कर्णधार, तर 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला संधी; वाचा 15 खेळाडूंचा खतरनाक Squads
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग
Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report
MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report
Konkan Politics : बाळ मानेंच्या माघारीनंतर हकालपट्टी; भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग | ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बीडमध्ये शेतकऱ्याने मोसंबी बागेवर फिरवला जेसीबी; पाण्याअभावी वाळून गेली बाग, जाळून केली खाक
बीडमध्ये शेतकऱ्याने मोसंबी बागेवर फिरवला जेसीबी; पाण्याअभावी वाळून गेली बाग, जाळून केली खाक
Monsoon Rain Maharashtra: मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार? हवामान खात्याकडून महत्त्वाची अपडेट, परिस्थिती पोषक, देवगडमध्ये..
मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार? हवामान खात्याकडून महत्त्वाची अपडेट, परिस्थिती पोषक, देवगडमध्ये..
आचारसंहिता म्हणजे शोलेचा गब्बरसिंग, कॉकरोच जनता पार्टीबद्दलही बोलले सुधीर मुनगंटीवार; म्हणाले, सामान्य माणसांचं मन..
आचारसंहिता म्हणजे शोलेचा गब्बरसिंग, कॉकरोच जनता पार्टीबद्दलही बोलले सुधीर मुनगंटीवार; म्हणाले, सामान्य माणसांचं मन..
Suryakumar Yadav : टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर रोहित शर्मासोबत जे घडलं, तेच सूर्यकुमार यादव सोबत झालं, BCCI च्या निर्णयानं सगळे चक्रावले...
टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर रोहित शर्मासोबत जे घडलं, तेच सूर्यकुमार यादव सोबत झालं, BCCI चा मोठा निर्णय
Bal Mane Vidhan Parishad Election 2026 : माघार अन् हकालपट्टीनंतर बाळ मानेंचे लागोपाठ दुसऱ्या दिवशी 'ते' स्टेटस चर्चेत; कोकणच्या राजकारणात तर्कवितर्कांना वेग, रोख नेमका कुणाकडे?
माघार अन् हकालपट्टीनंतर बाळ मानेंचे लागोपाठ दुसऱ्या दिवशी 'ते' स्टेटस चर्चेत; कोकणच्या राजकारणात तर्कवितर्कांना वेग, रोख नेमका कुणाकडे?
Chhagan Bhujbal Rajya Sabha Election 2026: छगन भुजबळांना राज्यसभा अन् समीर भुजबळांना राज्यात मंत्रिपद? राष्ट्रवादीचे नेते फडणवीसांना भेटले, महत्त्वाच्या घोषणेची शक्यता
छगन भुजबळांना राज्यसभा अन् समीर भुजबळांना राज्यात मंत्रिपद? राष्ट्रवादीचे नेते फडणवीसांना भेटले, महत्त्वाच्या घोषणेची शक्यता
राष्ट्रवादीने दोनवेळा दगा दिला, भाजपसोबत आतून छुपी युती होते का? पुणे विधानपरिषद बिनविरोध झाल्याने वसंत मोरेंचा सवाल
राष्ट्रवादीने दोनवेळा दगा दिला, भाजपसोबत आतून छुपी युती होते का? पुणे विधानपरिषद बिनविरोध झाल्याने वसंत मोरेंचा सवाल
Devendra Fadnavis and Supriya Sule: सुप्रिया सुळेंच्या घोडेबाजाराच्या आरोपाला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले, 'माणसं पैशापेक्षा प्रेमाने जिंकता येतात'
सुप्रिया सुळेंच्या घोडेबाजाराच्या आरोपाला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले, 'माणसं पैशापेक्षा प्रेमाने जिंकता येतात'
Embed widget