एक्स्प्लोर

झुकेगा नहीं! दहा वर्षांपासून भारत मायदेशात ‘अपराजीत’, आठ संघांना चारली धूळ

Indian Team Record : मायदेशात भारतीय संघाने लागोपाठ 15 कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम केला आहे. भारतीय संघाने मायदेशात अखेरची कसोटी मालिका 2012 मध्ये गमावली होती.

Indian Team Record : भारताने श्रीलंकेचा (IND vs SL) पराभवा करत पिंक बॉल कसोटीत विजय मिळवला. दुसऱ्य कसोटी सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने श्रीलंकेवर 238 धावांनी विजय मिळवला. भारताने चौथ्या डावात श्रीलंकेला विजयासाठी 447 धांवाचे आव्हान दिले होते. कर्णधार दिमुथ करुणारत्ने याच्या 107 धावांच्या खेळीनंतरही श्रीलंकेचा संघ 208 धावांपर्यंत मजल मारु शकला. दुसऱ्य सामन्यासह भारतीय संघाने दोन सामन्याची कसोटी मालिका 2-0 च्या फरकाने जिंकली आहे. भारतीय संघाचा मायदेशातील हा लागोपाठ 15 वा मालिका विजय आहे. 

मायदेशात भारतीय संघाने लागोपाठ 15 कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम केला आहे. भारतीय संघाने मायदेशात अखेरची कसोटी मालिका 2012 मध्ये गमावली होती. इंग्लंडविरोधात भारतीय संघाला मायदेशात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यावेळी भारतीय संघाचे नेतृत्व धोनीकडे होते. 2012 मध्ये इंग्लंड संघाने चार सामन्याची मालिका 2-1 च्या फरकाने जिंकली होती. त्यानंतर भारतीय संघाला मायदेश एकाही देशाला हरवता आलेले नाही. 

2012 नंतर भारतीय संघ मायदेशात अजेय आहे. इंग्लंडनंतर भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला 4-0 च्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला होता. मागील दहा वर्षात मायदेशात झालेल्या सर्व कसोटी मालिकेत भारतीय संघाने विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण अफ्रीका, न्यूजीलंड, श्रीलंका, बांग्लादेश, वेस्ट विंडिज आणि अफगाणिस्तान हे संघ भारत दौऱ्यावर येऊन गेले. या सर्व संघाना भारताने पराभूत केले. कसोटी खेळणाऱ्या संघात  पाकिस्तान, जिम्बाब्वे आणि आयरलंड या देशांनी भारताचा दौरा केलेला नाही. मागील दहा वर्षात आठ देशांना भारतात पराभवाचा सामना करावा लागला आहे. 

मायदेशात सर्वाधिक कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रमही भारताच्या नावावर आहे. आतापर्यंत कोणत्याही संघाला मायदेशात 10 पेक्षा जास्त कसोटी मालिका जिंकता आलेल्या नाहीत. मागील दहा वर्षांत भारतीय संघाने मायदेशात 15 कसोटी मालिका खेळल्या आहेत. यामध्ये 42 कसोटी सामने झाले आहेत.यापैकी फक्त दोन सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. 2017-18 दरम्यान ऑस्ट्रेलियाने पुण्यात भारताला हरवले होते. त्याशिवाय गतवर्षी इंग्लंडच्या संघाने चेन्नई कसोटीत भारताचा पराभव केला होता. हे दोन्ही सामने मालिकेतील पहिले सामने होते. त्यानंतर भारतीय संघाने कमबॅक करत मालिकेवर कब्जा मिळवला होता. मागील दहा वर्षात भारतीय संघाने मायदेशात 34 कसोटी सामने जिंकले आहेत. तर सहा सामने अनिर्णित राहिले आहेत.  

महत्त्वाच्या बातम्या

AUS W vs ENG W: ऑस्ट्रेलियाच्या महिला संघानं विक्रम रचला, सातव्यांदा टी-20 वर्ल्ड कपवर नाव कोरलं, इंग्लंडचं स्वप्न भंगलं
ऑस्ट्रेलियाच्या महिला संघानं विक्रम रचला, सातव्यांदा टी-20 वर्ल्ड कपवर नाव कोरलं, इंग्लंडचं स्वप्न भंगलं
Vaibhav Sooryavanshi:वैभव सूर्यवंशीला तिसऱ्या टी 20 मध्ये संधी मिळणार का? माजी क्रिकेटपटूचा टीम इंडियाच्या मॅनेजमेंटला महत्त्वाचा सल्ला     
वैभव सूर्यवंशीला तिसऱ्या टी 20 मध्ये संधी मिळणार का? माजी क्रिकेटपटूचा टीम इंडियाच्या मॅनेजमेंटला महत्त्वाचा सल्ला
IND vs ENG : मॅच तिथंच संपली होती, भारताच्या पराभवाचं कारण काय? आकाश चोप्राचं रोखठोक विश्लेषण, दोन खेळाडूंचं  नाव घेतलं...
मॅच तिथंच संपली होती, भारताच्या पराभवाचं कारण काय? आकाश चोप्राचं रोखठोक विश्लेषण, दोन खेळाडूंचं  नाव घेतलं...
Prithvi Shaw-Akriti Agarwal Row : मार्चमध्ये अंगठी घातली, जुलैमध्ये सगळंच संपवलं; पृथ्वी शॉने होणाऱ्या बायकोला फसवलं? आकृती अग्रवालच्या इन्स्टा पोस्टमुळे खळबळ, नेमकं काय म्हणाली?
मार्चमध्ये अंगठी घातली, जुलैमध्ये सगळंच संपवलं; पृथ्वी शॉने होणाऱ्या बायकोला फसवलं? आकृती अग्रवालच्या इन्स्टा पोस्टमुळे खळबळ, नेमकं काय म्हणाली?

व्हिडीओ

Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report
Mumbai Rain Tree Fall | मुंबईच्या रस्त्यांवर मृत्यूच्या झाडांचं 'जाळं' | ABP Majha Special Report
Dr. Budhajirao Mulik On Majha Katta :शेतकरी राजा कधी होईल? कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक माझा कट्ट्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mutual Fund : गेल्या एका वर्षातील सर्वोत्तम कामगिरी कोणत्या म्युच्युअल फंड्सनं केली, जाणून घ्या यादी
गेल्या एका वर्षातील सर्वोत्तम कामगिरी कोणत्या म्युच्युअल फंड्सनं केली, जाणून घ्या यादी
Raigad Palghar Rain Alert : रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा 'रेड अलर्ट', सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!
रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा 'रेड अलर्ट', सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!
Ram Mandir: राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांची पाच दिवसात 1 लाख कोटींची कमाई, भारती एअरटेलला सर्वाधिक फायदा तर एल अँड टी आणि रिलायन्सला फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांचे गुंतवणकदार मालामाल, 1 लाख कोटींची कमाई, चार कंपन्यांना फटका
Ayatollah Ali Khamenei: इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
Bhiwandi Rain : भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
Nashik Crime News: कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
Embed widget