IND vs WI, 3rd T20 : भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तिसऱ्या टी20 (3rd T20) सामन्यात श्रीलंका संघाने कर्णधार दासुन शनाकाच्या खेळीच्या जोरावर 146 धावा स्कोरबोर्डवर लावल्या आहेत. त्यामुळे भारताला विजयासाठी आता 147 धावा करायच्या आहेत. या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकल्यामुळे भारताने आधीच मालिकेत (India won Series) विजय मिळवला आहे. पण आता हा तिसरा सामना जिंकून भारत मालिकेत श्रीलंकेला क्लीन स्वीप देऊ शकतो.


सामन्यात नाणेफेक जिंकत श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण भारतीय गोलंदाजांनी हा निर्णय चूकीचा ठरवत श्रीलंकेवर पहिल्या ओव्हरपासून भेदक गोलंदाजी करत त्यांचे एक-एक फलंदाज माघारी धाडले. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका याने केवळ एकहाती झुंज देत 38 चेंडूत 2 षटकार आणि 9 चौकार करत 74 धावा केल्या. ज्यामुळे श्रीलंकेचा संघ किमान 146 धावा करु शकला आहे. भारताकडून सर्वच गोलंदाजांनी कसून गोलंदाजी केली. यावेळी आवेश खानने 2 तर सिराज, बिश्नोई आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली आहे. 



आतापर्यंत मालिका


तीन सामन्यांची टी20 मालिका भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळवली जात आहे. यात पहिले दोन सामने भारताने जिंकले आहेत. भारताने मालिकेतील पहिला सामना भारताने 62 धावांनी तर दुसरा सामना 7 विकेट्सनी जिंकला. दरम्यान यामुळे भारताने मालिका आधीच नावावर केली आहे. पण आजचा सामना जिंकल्यास भारत श्रीलंकेला व्हाईट वॉश देईल. तर श्रीलंका जिंकल्यास मालिकेचा शेवट गोड करेल. 


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha