एक्स्प्लोर

IND vs NZ Final : फायनलची वेळ बदलली? जाणून घ्या दुबईमध्ये किती वाजता रंगणार भारत-न्यूझीलंड सामन्याचा थरार

India vs New Zealand Champions Trophy 2025 Final : चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर 9 मार्च रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे.

IND vs NZ Champions Trophy 2025 Final : चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर 9 मार्च रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे होते. पण टीम इंडियाने त्यांचे सर्व सामने फक्त दुबईमध्ये खेळले. अंतिम सामन्यासाठी दोन ठिकाणे निश्चित करण्यात आली, त्यापैकी एक लाहोर स्टेडियम आणि दुसरे दुबई स्टेडियम होते. पण सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवून टीम इंडिया अंतिम फेरीत पोहोचताच, आता स्पर्धेचा अंतिम सामना फक्त दुबईमध्येच खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला.

सामना किती वाजता होणार सुरू? 

आता अंतिम सामन्याबाबत चाहत्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण होत आहे की, दुबईमध्ये खेळल्या जाणाऱ्या अंतिम सामन्याची वेळ बदलली आहे का? पण, असे काहीही नाही आणि सामना नियोजित वेळेवर खेळवला जाईल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हा अंतिम सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता खेळला जाईल. तर नाणेफेक 2 वाजता होईल. आतापर्यंत स्पर्धेतील सर्व सामने याच वेळी खेळले गेले आहेत.

आयसीसीच्या नॉकआउट सामन्यांमध्ये न्यूझीलंडचा वरचष्मा

आयसीसी स्पर्धांच्या बाद फेरीच्या सामन्यांमध्ये न्यूझीलंडने नेहमीच टीम इंडियावर वर्चस्व गाजवले आहे. दोन्ही संघ बाद फेरीत चार वेळा आमनेसामने आले आहेत. त्यापैकी किवी संघाने 3 वेळा विजय मिळवला आहे, तर टीम इंडियाला फक्त एकदाच विजय मिळवता आला आहे.

2000 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव केला, त्यानंतर 2019 च्या एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला, त्यानंतर 2021 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियाचा पराभव केला. पण, २०२३ च्या एकदिवसीय वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाने न्यूझीलंडला पराभूत केले होते.

2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाने अद्याप एकही सामना गमावलेला नाही. भारतीय संघाने या चारही सामन्यांमध्ये (तीन लीग सामने आणि एक उपांत्य फेरी) नेत्रदीपक विजय मिळवला आहे. भारताने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. याशिवाय, न्यूझीलंड संघाला साखळी सामन्यात टीम इंडियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

एकदिवसीय सामन्यांमध्ये भारत आणि न्यूझीलंड हेड-टू-हेड रेकॉर्ड

आतापर्यंत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये 119 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी टीम इंडियाने 61 सामने जिंकले आहेत आणि न्यूझीलंडने 50 सामने जिंकले आहेत. याशिवाय, 7 सामने अनिर्णीत राहिले आणि एक सामना बरोबरीत सुटला.

अंतिम सामन्यासाठी टीम इंडियाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, मोहम्मद शमी.

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
Ajinkya Rahane : यशस्वी जयस्वालचं करिअर संकटात होतं, 4 सामन्यांच्या बंदीच्या कारवाईतून कसं वाचवलं? अजिंक्य रहाणेनं गुपित सांगितलं
यशस्वी जयस्वालला त्यावेळी वाईट वाटलं असेल, 4 सामन्यांच्या बंदीतून कसं वाचवलं? अजिंक्य रहाणे म्हणाला... 
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
IND vs SL : श्रीलंकेने गेममध्ये आणला ट्विस्ट! 4 विकेट बाकी असतानाच डाव घोषित, भारतासमोर 207 धावांचं लक्ष्य, शुभमन गिलचा मोठा निर्णय
श्रीलंकेने गेममध्ये आणला ट्विस्ट! 4 विकेट बाकी असतानाच डाव घोषित, भारतासमोर 207 धावांचं लक्ष्य, शुभमन गिलचा मोठा निर्णय

व्हिडीओ

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Embed widget