एक्स्प्लोर

तिसरा टी20 सामना पावसाने जिंकला, भारताची मालिकेत 2-0 ने बाजी

IND vs IRE 3rd T20: भारत आणि आयर्लंड यांच्यातील अखेरचा टी 20 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे.

IND vs IRE 3rd T20: भारत आणि आयर्लंड यांच्यातील अखेरचा टी 20 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. तीन सामन्याची मालिका भारताने 2-0 ने जिंकली आहे.  आयर्लंडमध्ये आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. पण दुपारपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे नाणेफेकही झाली नाही. पंचांनी अखेर सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दोन्ही टी 20 सामन्यात भारताने बाजी मारली होती. आयर्लंडलाही एकही सामना जिंकता आला नाही. 

भारतासाठी या मालिकेत अनेक सकारात्मक बाबी झाल्या. त्यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जसप्रीत बुमराहचे दमदार कमबॅक होय.   याशिवाय भारताने या मालिकेत रिंकू सिंगसारख्या उदयोन्मुख खेळाडूला संधी दिली. रिंकू सिंह याने दुसऱ्या सामन्यात विस्फोटक फलंदाजी करत सामनावीर पुरस्कार पटकावला. प्रसिद्ध कृष्णाच्या पुनरागमनामुळे भारताचे वेगवान गोलंदाजी आक्रमणही मजबूत झाले. आता भारतीय संघ 2 सप्टेंबरला आशिया कपच्या सामन्यात थेट मैदानात उतरणार आहे. 

आयर्लंडविरोधात गोलंदाजांची कामगिरी कशी राहिली ?

भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराह याने दमदार कमबॅक केले. बुमराहने दोन सामन्यात आयर्लंडच्या चार फलंदाजांना तंबूत पाठवले. बुमराहच्या भेदक माऱ्यापुढे आयर्लंडच्या फलंदाजांनी नांगी टाकली. मालिकेतील दमदार कामगिरीमुळे जसप्रीत बुमराह याला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. जसप्रीत बुमराहशिवाय प्रसिद्ध कृष्णा याचेही पुनरागमन दमदार झाले.  प्रसिद्ध कृष्णा यानेही दोन सामन्यात चार विकेट घेतल्या. त्याशिवाय रवि बिश्नोई याने भेदक मारा केला. बिश्नोईने आपल्या फिरकीमध्ये आयरिश खेळाडूंना अडकवले. रवि बिश्नोई याने दोन सामन्यात चार विकेट घेतल्या. अर्शदीप सिंह याला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. अर्शदीप सिंह याने दोन सामन्यात दोन विकेट घेतल्या. वॉशिंगटन सुंदर आणि शिवम दुबे यांना एकही विकेट मिळाली नाही.

फलंदाजांची कामगिरी कशी राहिली - 

पहिल्या सामन्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे भारताची फलंदाजी फक्त 6.5 षटकांची झाली होती. यशस्वी जायस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांनाच संधी मिळाली होती. यशस्वीने पहिल्या डावात 24 तर दुसऱ्या सामन्यात 18 धावांचे योगदान दिले. ऋतुराज गायकवाड याने दुसऱ्या सामन्यात 58 धावांची अर्धशतकी खेळी केली होती. तर पहिल्या डावात नाबाद 18 धावांचे योगदान दिले होते. संजूने दुसऱ्या सामन्यात 40 धावा चोपल्या होत्या. रिंकू सिंह याने दुसऱ्या सामन्यात 21 चेंडूत 38 धावांचा पाऊस पाडला होता. तिलक वर्माला दोन्ही सामन्यात अपयश आले. पहिल्या सामन्यात गोल्डन डकचा शिकार झाला तर दुसऱ्या सामन्यात फक्त एक धाव काढता आली. शिवम दुबे याने दुसऱ्या सामन्यात 22 धावा जोडल्या होत्या. 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Indore Accident: घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?
पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?
अजित पवार अन् महेश लांडगेंच्या वादात फडणवीसांची उडी; दादांना शायरीतून टोला, आमदारालाही सल्ला
अजित पवार अन् महेश लांडगेंच्या वादात फडणवीसांची उडी; दादांना शायरीतून टोला, आमदारालाही सल्ला
Charter Plane Crash: 9 आसनी चार्टर्ड विमान कोसळले, पायलटसह 6 जण गंभीर जखमी; भीषण अपघात नेमका घडला तरी कसा?
9 आसनी चार्टर्ड विमान कोसळले, पायलटसह 6 जण गंभीर जखमी; भीषण अपघात नेमका घडला तरी कसा?

व्हिडीओ

Aaditya Thackeray Speech Dadar : आदित्य ठाकरेंचं दादरमध्ये दणदणीत भाषण, मुख्यमंत्र्‍यांवर टीका
Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indore Accident: घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?
पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?
अजित पवार अन् महेश लांडगेंच्या वादात फडणवीसांची उडी; दादांना शायरीतून टोला, आमदारालाही सल्ला
अजित पवार अन् महेश लांडगेंच्या वादात फडणवीसांची उडी; दादांना शायरीतून टोला, आमदारालाही सल्ला
Charter Plane Crash: 9 आसनी चार्टर्ड विमान कोसळले, पायलटसह 6 जण गंभीर जखमी; भीषण अपघात नेमका घडला तरी कसा?
9 आसनी चार्टर्ड विमान कोसळले, पायलटसह 6 जण गंभीर जखमी; भीषण अपघात नेमका घडला तरी कसा?
मुंडेंच्या परळीत अवघ्या 1 जागेसाठी राष्ट्रवादीने MIM ला घेतलं; शिंदेंच्या शिवसेनेकडून संताप, महायुतीत वाद
मुंडेंच्या परळीत अवघ्या 1 जागेसाठी राष्ट्रवादीने MIM ला घेतलं; शिंदेंच्या शिवसेनेकडून संताप, महायुतीत वाद
शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला दे धक्का; आमदारावर आरोप, भाजपचे तीन माजी नगरसेवक शिवसेनेत
शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला दे धक्का; आमदारावर आरोप, भाजपचे तीन माजी नगरसेवक शिवसेनेत
Prakash Ambedkar on Badlapur Nagarsevak: भाजप हा खाणाऱ्यांचा पक्ष होताच, तो आता बलात्कारातील आरोपींचा पक्ष झाला, व्यभिचाराचा मार्ग RSS भाजपने अवलंबला आहे; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
भाजप हा खाणाऱ्यांचा पक्ष होताच, तो आता बलात्कारातील आरोपींचा पक्ष झाला, व्यभिचाराचा मार्ग RSS भाजपने अवलंबला आहे; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
देवाच्या नावाखाली 60 हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठीच शक्तिपीठ महामार्ग; त्यापेक्षा विदर्भ ते कोकण जोडणारा कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वेमार्ग तातडीने पूर्ण करा; राजू शेट्टींचा हल्लाबोल
देवाच्या नावाखाली 60 हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठीच शक्तिपीठ महामार्ग; त्यापेक्षा विदर्भ ते कोकण जोडणारा कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वेमार्ग तातडीने पूर्ण करा; राजू शेट्टींचा हल्लाबोल
Embed widget