एक्स्प्लोर

IND vs BAN : दुसऱ्या कसोटीत विजयाचे शिल्पकार अश्विन-अय्यरने खास विक्रमही केला नावावर, वाचा सविस्तर

Ashwin and Iyer : बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आर. अश्विन आणि श्रेयस अय्यर यांनी अप्रतिम पार्टनरशिप करत भारताला विजय मिळवून दिला. या विजयासह त्यांनी एक मोठा विक्रमही आपल्या नावावर केला आहे.

R Ashwin Record in IND vs BAN Test : भारताने बांगलादेशचा (IND vs BAN) त्यांच्याच घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत 2-0 ने पराभव केला आहे. भारतीय संघाच्या या विजयामुळे भारतवासियांचा नाताळ सणाचा आनंद द्विगुणित झाला आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या कसोटीत रवीचंद्रन अश्विन (R Ashwin) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) विजयाचे हिरो ठरले. या सामन्यात दोघांनी 71 धावांची विजयी भागीदारी केली. त्याचबरोबर त्यांच्या या भागीदारीमुळे एक मोठा विक्रमही त्यांनी केला आहे. चौथ्या डावात भारताकडून 8व्या विकेटसाठी ही दुसरी सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे00.

खास विक्रम अय्यर-अश्विनच्या नावावर

बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात श्रेयस अय्यर आणि आर अश्विनने भारतासाठी नाबाद 71 धावांची सामना जिंकवून देणारी भागिदारी केली आणि एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. चौथ्या डावात भारताकडून 8व्या क्रमांकासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत ही जोडी दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. अश्विन आणि अय्यर यांनी कपिल देव आणि एल शिवराम कृष्णन यांच्या रेकॉर्डला मागे टाकत हा खास विक्रम केला आहे. कपिल देव आणि एल शिवराम कृष्णन यांनी 1985 मध्ये कोलंबोमध्ये श्रीलंकेविरुद्ध 70 धावांची भागीदारी केली होती. त्याचबरोबर अमर सिंह आणि लाल सिंह या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर भारताच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात त्याने 8व्या विकेटसाठी त्यांनी 74 धावांची भागीदारी केली.

चौथ्या डावात 8व्या विकेटसाठीची भारताकडून सर्वात मोठी भागीदारी

1932 - 74 धावा एल अमर सिंग आणि लाल सिंग विरुद्ध इंग्लंड (लॉर्ड्स)

2022 - 71 धावा श्रेयस अय्यर आणि आर अश्विन विरुद्ध बांगलादेश (मीरपूर) 

1985 - 70 धावा कपिल देव आणि एल शिवराम कृष्णन विरुद्ध श्रीलंका (कोलंबो)

भारताने मालिकाही जिंकली

भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दोन्ही सामने जिंकत भारताने क्लिन स्वीप दिला आहे. यावेएळी पहिला कसोटी सामना चितगाव येथे खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाने यजमान बांगलादेशचा 188 धावांनी पराभव केला. तर दुसरा सामना फारच अटीतटीचा झाला. भारताला शेवटच्या डावात 145 धावांचे माफक लक्ष्य असतानाही 7 गडी गमावून भारत जिंकला आणि तीन विकेट्च्या फरकाने सामना जिंकत भारताने मालिका जिंकली.

हे देखील वाचा-

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : समोरच्या उमदेवारानं अर्ज मागं घ्यावा म्हणून अधिकाराचा दुरुपयोग करणारा राहुल नार्वेकर निवडणूक आयोगाला चालून जातो : उद्धव ठाकरे
नाशिकच्या प्रचारसभेत घराणेशाहीच्या मुद्यावरुन भाजपला प्रत्युत्तर, राहुल नार्वेकरांचं नाव घेत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
Tilak Varma: तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
Tata : टाटा कंपनीच्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांनी केलं मालामाल, 20 वर्षात 1 लाखांचे बनले 1 कोटी, जाणून घ्या
टाटा कंपनीच्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांनी केलं मालामाल, 20 वर्षात 1 लाखांचे बनले 1 कोटी, जाणून घ्या
Share Market : अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा

व्हिडीओ

Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत
Ambadas Danve On MIM : इम्तियाज जलील भाजपचा हस्तक, त्याने शहराला व्यसन लावलं
Raj Thackeray Majha Katta: भाजपचा मुंबईवर डोळा, राज ठाकरेंचा गंभीर आरोप
Shinde vs Nashik Navi Mumbai :जुनं वॉर,आरोपांना धार;MMRमध्ये दोन राजकीय वाघांची झुंज Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : समोरच्या उमदेवारानं अर्ज मागं घ्यावा म्हणून अधिकाराचा दुरुपयोग करणारा राहुल नार्वेकर निवडणूक आयोगाला चालून जातो : उद्धव ठाकरे
नाशिकच्या प्रचारसभेत घराणेशाहीच्या मुद्यावरुन भाजपला प्रत्युत्तर, राहुल नार्वेकरांचं नाव घेत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
Tilak Varma: तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
Tata : टाटा कंपनीच्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांनी केलं मालामाल, 20 वर्षात 1 लाखांचे बनले 1 कोटी, जाणून घ्या
टाटा कंपनीच्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांनी केलं मालामाल, 20 वर्षात 1 लाखांचे बनले 1 कोटी, जाणून घ्या
Share Market : अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?
काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?
Ambernath : अंबरनाथ नगरपरिषदेवर भगवा फडकणार, राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा, बहुमताचा आकडा पार
अंबरनाथ नगरपरिषदेवर भगवा फडकणार, राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा, बहुमताचा आकडा पार
Meenakshi Shinde : 'मानपाड्यात राहायचं आहे ना? नादी लागशील तर वाट लावेन', कार्यकर्त्याला आक्षेपार्ह शिवीगाळ; कथित ऑडिओ क्लिपवर मिनाक्षी शिंदे म्हणाल्या...
'मानपाड्यात राहायचं आहे ना? नादी लागशील तर वाट लावेन', कार्यकर्त्याला आक्षेपार्ह शिवीगाळ; कथित ऑडिओ क्लिपवर मिनाक्षी शिंदे म्हणाल्या...
Vishwas Abaji Patil: ऐन निवडणुकीत कोल्हापुरात काँग्रेसला झटका; 'गोकुळ'चे माजी अध्यक्ष विश्वास आबाजी पाटील शिंदे गटात प्रवेश करणार
ऐन निवडणुकीत कोल्हापुरात काँग्रेसला झटका; 'गोकुळ'चे माजी अध्यक्ष विश्वास आबाजी पाटील शिंदे गटात प्रवेश करणार
Embed widget