India vs Bangladesh 1st Test Chepauk stadium Records : भारत आणि बांगलादेश यांच्यातील मालिकेतील पहिला कसोटी सामना 19 सप्टेंबरपासून चेन्नईच्या चेपॉक येथील एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे. अशा परिस्थितीत चेन्नईच्या खेळपट्टीचा मूड काय असेल असा प्रश्न तमाम क्रिकेट चाहत्यांच्या मनात नक्कीच असेल. चेन्नईत नाणेफेक जिंकल्यानंतर काय करावे? प्रथम फलंदाजी की गोलंदाजी... चेपॉकमध्ये नाणेफेक जिंकल्यास रोहित शर्मा कोणाता निर्णय घेणार? येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे नंतर येथे फलंदाजी करताना टीम इंडियाचा रेकॉर्ड खराब आहे. 


भारतीय संघाने आपला पहिला कसोटी सामना फेब्रुवारी 1934 मध्ये चेपॉक चेन्नई येथे इंग्लंडविरुद्ध खेळला, या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा 202 धावांनी पराभव झाला. त्याच वेळी, भारतीय संघाने फेब्रुवारी 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध नुकताच कसोटी सामना खेळला होता. जिथे त्याने इंग्लंडचा 317 धावांनी पराभव केला. भारतीय संघ चेन्नईमध्ये एकूण 34 सामने खेळला आहे, येथे भारताने एकूण 15 सामने जिंकले आहेत. 7 सामने अनिर्णित राहिले आहेत. भारतीय संघाने येथे 11 सामने हारला आहे. आणि एक सामना टाय झाला.


आता हे 34 सामने समजून घेतले तर ज्या संघाने प्रथम फलंदाजी केली, त्या संघाने 12 वेळा विजय मिळवला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या संघाने 10 वेळा विजय मिळवला आहे. 11 सामने अनिर्णित राहिले आणि 1 सामना बरोबरीत राहिला.


भारतीय संघाने येथे 11 सामन्यांत प्रथम फलंदाजी केली आहे. यातील 6 सामने जिंकले आहेत, 1 सामना हरला आहे, तर 4 सामने अनिर्णित राहिले आहेत. भारतीय संघाने येथे प्रथम गोलंदाजी करत एकूण 23 सामने खेळले आहेत. त्यापैकी 9 सामने जिंकले, 6 सामने गमावले, 1 सामना बरोबरीत आणि 7 सामने अनिर्णित राहिले. म्हणजे चेपॉकमध्ये टीम इंडियाला नंतर गोलंदाजी उपयोगी पडणार नाही हे स्पष्ट झाले आहे. अशा परिस्थितीत नाणेफेक जिंकल्यानंतर रोहित प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पाहिजे.


पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.


हे ही वाचा -


IPL 2025 Mega Auction : एक, दोन नाही तर... 6 संघांचे कर्णधार बदलणार, या हंगामात दिग्गज खेळाडूंची होणार हकालपट्टी?


Shreyas Iyer : श्रेयस अय्यरसाठी टीम इंडियाचे दरवाजे बंद? BCCIकडून आला आदेश