ENG vs IND : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात आज बर्मिंगहमच्या मैदानात टी20 मालिकेतील दुसरा टी20 सामना खेळवला जाणार आहे. पहिल्या टी20 मध्ये भारताने 50 धावांनी विजय मिळवल्यानंतर आज दुसरा सामना खेळवला जात आहे. इंग्लंडच्या बर्मिंगहमधील एजबेस्टन (Edgbaston) मैदानात सामना खेळवला जात असून याठिकाणची खेळपट्टी (Pitch Report) फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठी फायद्याची असल्याने एक चुरशीचा सामना आज पाहायला मिळू शकतो.


कसा आहे पिच रिपोर्ट?


आज सामना होणाऱ्या एजबेस्टनच्या मैदानात सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना चांगली गती मिळून विकेट मिळतात. पण जस-जसा सामना पुढे जातो पिचवर फलंदाजी करणं अधिक सोपं होतं. यामुळेच याठिकाणी फलंदाज आणि गोलंदाज दोघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळते. या मैदानावर टी20 सामन्यांत सरासरी स्कोर 160 रन इतका असून बहुतांश वेळी नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी घेऊ इच्छित असतो.


दिग्गज परतणार, कोणाला विश्रांती?


पहिल्या टी20 सामन्यात भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli), ऋषभ पंत (Rishabh Pant), जसप्रीत बुमराह (Japrit Bumrah) आणि रविंद्र जाडेजा (Ravindra Jadeja) यांना विश्रांती देण्यात आली होती. मात्र, आज होणार्या दुसऱ्या टी-20 सामन्यात या सर्व खेळाडूंचं पुनरागमन होणार आहे. यामुळं पहिल्या टी-20 मध्ये खेळलेल्या काही खेळाडूंचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. यावेळी अर्शदीप सिंह, ईशान किशन, अक्षर पटेल यांना संघातून वगळलं जाऊ शकतं


हे देखील वाचा-