IND vs WI : भारत आणि वेस्ट इंडीज(IND vs WI) यांच्यातील दुसऱ्या टी20 सामन्यात (2nd T20) भारताने आठ धावांनी विजय मिळवला. दरम्यान या सामन्यात भारताने 186 धावांची मोठी धावसंख्या उभारली. ज्यामध्ये विराटचं धमाकेदार अर्धशतक महत्त्वपूर्ण ठरलं. विराटने 41 चेंडूत 7 चौकार आणि एक षटकार ठोकत 52 धावा केल्या. दरम्यान त्याच्या या खेळीदरम्यान तो ज्या दमदार फॉर्ममध्ये दिसला, त्याबाबत त्याला सामन्यानंतर विचारण्यात आले. यावर बोलताना विराट कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर त्याचा फ्री गेम खेळत असल्याचं दिसून आलं. 


यावेळी बोलताना विराट म्हणाला, ''बऱ्याच काळानंतर जबाबदारी थोडी कमी झाल्यानंतर खेळत होतो. दरम्यान हवे तसे शॉट्स खेळणं पण हे खेळताना बेजबाबदार नसणं असा दोन्हीतील समतोल साधता येणं गरजेचं असतं, हाच समतोल मला आज मिळाला असे वाटत होते त्यामुळे अशी खेळी करु शकलो.''



विराटने या विजयानंतर आनंदी होत सामन्यातील काही फोटोज सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.







 


भारताचा आठ धावांनी विजय


या सामन्यात नाणेफेक जिंकत वेस्ट इंडीजचा कर्णधार पोलार्डने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ज्यानंतर रोहित शर्मा आणि ईशान किशन सलामीला आले. किशन 2 धावा करुन बाद झाला. तर रोहित 19 धावा करुन तंबूत परतला. पण विराट कोहली आज भल्यातच फॉर्ममध्ये दिसत होता. पण अर्धशतक पूर्ण होताच तो त्रिफळाचित झाला आणि 52 धावा करुन तंबूत परतला. सूर्यकुमारनेही 8 धावा केल्या. पण त्यानंतर पंत आणि व्यंकटेश यांनी धमाकेदार फलंदाजी करायला सुरुवात केली. अय्यर 33 धावा करुन बाद झाला. पण पंतने नाबाद अर्धशतक (52) झळकावत भारताची धावसंख्या 186 पर्यंत पोहोचवली.


ज्यामुळे विजयासाठी विडींजला 187 धावांची गरज होती. विडींजकडून रोस्टन चेसने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर शेफर्ड आणि कॉट्रेल यांनी 1-1 विकेट घेतली. त्यानंतर भारताने गोलंदाजी करत पहिली विकेट लवकर घेतली. पण नंतर विडींजने सावध खेळी केली. नंतर पूरन आणि पोवेल यांनी दमदार अर्धशतक लगावली. पण 19 व्या षटकात अनुभवी भुवनेश्वरने केवळ चार धावा देत विडींजची महत्त्वाची अशी पूरनची विकेट घेतली. ज्यानंतर शेवटच्या षटकात हर्षलने 16 धावा दिल्या पण तरी देखील भारताला विजय मिळवता आला. 


हे ही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha