एक्स्प्लोर

विश्वचषकातील पराभव जिव्हारी, चेतन शर्माच्या नेतृत्वातील निवड समिती बरखास्त, नव्याने अर्ज मागवले

BCCI Sacks National Selection Committee: चेतन शर्माच्या नेतृत्वातील निवड समितीच्या सर्व सदस्यांना बरखास्त करण्यात आले आहे, पीटीआयनं याबाबत वृत्त दिले आहे.

BCCI Sacks National Selection Committee: ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-ट्वेन्टी विश्वचषकातील उपांत्य फेरीतल्या टीम इंडियाच्या पराभवाचा फटका भारतीय सीनीयर निवड समितीला बसलाय. निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मा यांच्यासह सर्व निवड समिती सदस्यांना बरखास्त करण्यात आलंय आणि या पराभवानंतर बीसीसीआयने पाचही जागांसाठी अर्ज मागवलेत. टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाला पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड अशा तीन तगड्या संघांशी मुकाबला करावा लागला होता. यापैकी पाकिस्तानची लढत कशीबशी जिंकली होती. तर, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडकडून त्यांना मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. या कामगिरीकरता सदोष संघनिवड जबाबदार असल्याचा सूर उमटला आणि त्याकरता निवड समितीला जबाबदार धरत बीसीसीआयकडून हे पाऊल उचलण्यात आल्याचं बोललं जातंय. दरम्यान, नवीन नियुक्ती होईपर्यंत शर्मा यांची निवड समितीच काम पाहणार आहे. येणाऱ्या तीन वर्षात दोन विश्वचषक स्पर्धा आणि आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धा अशा महत्त्वाच्या स्पर्धा पार पडणार आहेत. त्यामुळे या स्पर्धांसाठी संघ निवडीच्या वेळी निवड समितीची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.

बीसीसीआयने ट्वीट करत निवड समितीच्या पाच जागांसाठी अर्ज मागवल्याची माहिती दिली आहे.  अर्ज करण्याची  अखेरची तारीख 28 नोव्हेंबर 2022 इतकी आहे. 

 
कोण करु शकतो अर्ज?
अर्ज करणाऱ्या उमेदवारांनं कमीतकमी सात आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळलेले असावेत. अथवा 30 प्रथम श्रेणीचे सामने खेळले असावेत. किंवा 10 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि 20 प्रथम श्रेणीचे सामने खेळले असावेत. अर्ज करणाऱ्या उमेदवारानं पाच वर्षांपूर्वीच क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली असावी. 
 

पराभवाचं खापर निवड समितीवर?
ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या टी 20 विश्वचषकात भारताचे आव्हान उपांत्य फेरीत संपले होते. उपांत्य फेरीत इंग्लंडने भारताचा दहा विकेटने पराभव केला होता. त्याशिवाय आशिया चषकात भारताला फायनलपर्यंत धडक मारता आली नव्हती. विश्वचषकातील भारतीय संघाच्या निवडीवर अनेकांनी टीका केली होती. विश्वचषकातील पराभव जिव्हारी लागल्याचं बोललं जात आहे. त्यामुळेच शुक्रवारी रात्री  बीसीसीआयने निवड समितीच्या रिक्त जांगासह सर्वच जागांसाठी अर्ज मागवले आहेत. 

24 डिसेंबर 2020 रोजी बीसीसीआयने चेतन शर्मा यांची निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड केली होती. शर्मा यांच्यासह ॲबी कुरुविला आणि देबाशीष मोहंती यांचाही निवड समितीत समावेश करण्यात आला होता.  सुनील जोशी आणि हरविंदरसिंग निवड यांना समितीत कायम ठेवण्यात आले  होते. पण आता बीसीसीआयने एकाही सदस्याला कायम न ठेवता सर्वच जागांसाठी अर्ज मागवले आहेत. त्यामुळे विश्वचषकातील निराशाजनक कामगिरीचं खापर निवड समितीवर फोडल्याची चर्चा आहे. काही क्रीडा तज्ज्ञांच्या मते, दोन वर्षांमध्ये आयसीसीच्या मोठ्या तीन स्पर्धा होणार आहे. त्यामुळे बीसीसीआयने हा मोठा विचार केलाय आहे. 

आणखी वाचा :
FIFA WC 2022: सर्वाधिक वेळा उपविजेता ठरलाय जर्मनीचा संघ, एका सामन्यात हंगेरीचे 10 गोल; फुटबॉल विश्वचषकातील खास पराक्रम

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma Retirement: तू 2027 च्या विश्वचषक स्पर्धेच्या नियोजनाचा भाग नाही, निवड समितीचा रोहितला मेसेज; आता 3 कारणं आली समोर
तू 2027 च्या विश्वचषक स्पर्धेच्या नियोजनाचा भाग नाही, निवड समितीचा रोहितला मेसेज; आता 3 कारणं आली समोर
Rohit Sharma Retirement: गंभीर-आगरकरांनी रोहितला तो मेसेज धाडला, कोहलीच्या चेहऱ्यावरील रंग उतरला; सामना सुरु असताना बाजूला जाऊन बसला, नेमकं काय घडलं?, VIDEO
गंभीर-आगरकरांनी रोहितला तो मेसेज धाडला, कोहलीच्या चेहऱ्यावरील रंग उतरला; सामना सुरु असताना बाजूला जाऊन बसला, नेमकं काय घडलं?, VIDEO
Rohit Sharma Retirement: रोहित शर्मा 19 जुलैला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार; वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार, टीम इंडियाच्या चाहत्यांना धक्का बसणारी माहिती समोर
रोहित शर्मा 19 जुलैला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार; वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार, टीम इंडियाच्या चाहत्यांना धक्का बसणारी माहिती समोर
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक

व्हिडीओ

Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Rain Updates: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
Ratnagiri News: दापोलीच्या हर्णे राजवाडीत पुन्हा दरडीचे भीषण संकट, बेकायदेशीर उत्खननामुळे 60 कुटुंबे धोक्यात; 2010 च्या 8 बळींच्या आठवणीने ग्रामस्थ धास्तावले
दापोलीच्या हर्णे राजवाडीत पुन्हा दरडीचे भीषण संकट, बेकायदेशीर उत्खननामुळे 60 कुटुंबे धोक्यात; 2010 च्या 8 बळींच्या आठवणीने ग्रामस्थ धास्तावले
धक्कादायक घटना, वरिष्ठांचा जाचाला कंटाळून ZP शिक्षकाची दोन मुलं अन् गाडीसह नदीपात्रात उडी; व्हॉट्सअपला स्टेटस
धक्कादायक घटना, वरिष्ठांचा जाचाला कंटाळून ZP शिक्षकाची दोन मुलं अन् गाडीसह नदीपात्रात उडी; व्हॉट्सअपला स्टेटस
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक म्हणाले, 'सोमवारपर्यंत जिवंत राहायचंय..' उपोषण सुरू ठेवल्यास अवयव निकामी होण्याचा धोका, परिस्थिती गंभीर असल्याचा डॉक्टरांचा इशारा
सोनम वांगचुक म्हणाले, 'सोमवारपर्यंत जिवंत राहायचंय..' उपोषण सुरू ठेवल्यास अवयव निकामी होण्याचा धोका, परिस्थिती गंभीर असल्याचा डॉक्टरांचा इशारा
Rohini Khadse: फडणवीसजी-शिंदे साहेब 2100-1500 सोडा, लाडक्या बहिणींसाठी तुम्हाला साडीही परवडत नाही का? रोहिणी खडसेंचा सवाल
फडणवीसजी-शिंदे साहेब 2100-1500 सोडा, लाडक्या बहिणींसाठी तुम्हाला साडीही परवडत नाही का? रोहिणी खडसेंचा सवाल
Monsoon Session: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा अजेंडा निश्चित; खासदार फोडाफोडीने चर्चेत आलेलं वादग्रस्त मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा मांडणार की नाही?
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा अजेंडा निश्चित; खासदार फोडाफोडीने चर्चेत आलेलं वादग्रस्त मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा मांडणार की नाही?
Satej Patil on Jayant Patil: जयंतराव 'उजव्या वळणावर' येऊन ठेपल्याची चर्चा शिगेला पोहोचली; सतेज पाटील सूचक वक्तव्य करत काय म्हणाले?
जयंतराव 'उजव्या वळणावर' येऊन ठेपल्याची चर्चा शिगेला पोहोचली; सतेज पाटील सूचक वक्तव्य करत काय म्हणाले?
ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर केल्यानंतरही अनुसूचित जमातीचे लाभ; सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत, तब्बल 27 जणांची जम्बो समिती नेमली
ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर केल्यानंतरही अनुसूचित जमातीचे लाभ; सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत, तब्बल 27 जणांची जम्बो समिती नेमली
Embed widget