एक्स्प्लोर

मी कुठे आहे आणि काय करतोय हे कोहलीला माहित होतं : नेहरा

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी गोलंदाज मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांना वगळण्यात आलं आहे. तर 38 वर्षीय आशिष नेहराला संधी देण्यात आली.

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. जवळपास 8 महिन्यानंतर 38 वर्षीय आशिष नेहराचं पुनरागमन झालं आहे. तर सुरेश रैना, युवराज सिंह आणि अमित मिश्रा यांच्या हाती पुन्हा एकदा निराशा लागली आहे. ''अखेरचा टी-20 सामना खेळल्यानंतर मी कुठे होतो हे कुणाला माहित नसेल. मात्र निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद आणि कर्णधार विराट कोहलीला ते चांगलं माहित होतं. दुखापतीतून सावरल्यानंतर फिटनेसवर काम केलं. पुनरागमनासाठी आवश्यक ती सर्व तयारी करत होतो'', असं नेहराने निवडीनंतर सांगितलं. ''टीकेची कधीही चिंता करत नाही. मी कुठे आहे हे भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुमला माहित असतं. हे निवड समितीलाही माहित असतं आणि कोहलीलाही. मी संघात आहे, तर निश्चितच काही तरी योगदान देत असेल'', असंही नेहरा म्हणाला. ''वयाचा जास्त विचार करत नाही. पुढच्या तीन सामन्यांसाठी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आशिष नेहरा चांगला खेळला तरी ती बातमी होते आणि नाही खेळला तरी ती बातमी होते'', असंही त्याने सांगितलं. 7 ऑक्टोबरपासून सुरु होत असलेल्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. गोलंदाज मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांना या मालिकेतून वगळण्यात आलं आहे. तर 38 वर्षीय आशिष नेहराला संधी देण्यात आली. नेहराने अखेरचा सामना फेब्रुवारी 2017 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता. तर विकेटकीपर दिनेश कार्तिकलाही संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत सलग चार अर्धशतकं ठोकणाऱ्या अजिंक्य रहाणेलाही टी-20 संघात स्थान देण्यात आलेलं नाही. त्याच्याऐवजी शिखर धवनचा संघात समावेश करण्यात आला आहे. तर रवींद्र जाडेजाला पुन्हा एकदा संघातून बाहेर ठेवण्यात आलं आहे. सलामीवीर केएल राहुलला टी-20 संघात स्थान देण्यात आलं आहे. टीम इंडियाचा सिक्सर किंग युवराज सिंहला पुन्हा एकदा संघात स्थान देण्यात आलेलं नाही. शिवाय अनेक दिवसांपासून संघातून बाहेर असलेल्या सुरेश रैनाचीही यावेळी निराशा झाली आहे. संबंधित बातमी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

महत्त्वाच्या बातम्या

Abhishek Sharma: अभिषेक शर्माकडून शतकानंतर अनोखा जल्लोष, 'ओम नम:शिवाय' मंत्राचा उच्चार, Video व्हायरल
अभिषेक शर्माकडून शतकानंतर अनोखा जल्लोष, 'ओम नम:शिवाय' मंत्राचा उच्चार, Video व्हायरल
पृथ्वी शॉ च्या आयुष्यात मोठं वादळ, सहा महिन्यातच आकृती अग्रवालसोबचं नातं संपवलं! नेमकं काय घडलं? आकृतीची भावनिक पोस्ट
पृथ्वी शॉ च्या आयुष्यात मोठं वादळ, सहा महिन्यातच आकृती अग्रवालसोबचं नातं संपवलं! नेमकं काय घडलं? आकृतीची भावनिक पोस्ट
IPL Auction: मिनी आयपीएल लिलाव भारतातच होणार, बीसीसीआचा मोठा निर्णय; इम्पॅक्ट प्लेअरवर नेमकं काय ठरलं?
मिनी आयपीएल लिलाव भारतातच होणार, बीसीसीआचा मोठा निर्णय; इम्पॅक्ट प्लेअरवर नेमकं काय ठरलं?
Ind vs WI Team India Squad Against West Indies ODI: रवींद्र जडेजा, नमन धीर, आकिब नबी IN...; वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाचा चक्रावणारा संघ, पाहा संपूर्ण Squad
रवींद्र जडेजा, नमन धीर, आकिब नबी IN...; वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाचा चक्रावणारा संघ, पाहा संपूर्ण Squad

व्हिडीओ

Manoj Jarange Beed UNCUT : मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित; सरकारचं शिष्टमंडळ पोहोचल्यानंतर काय घडलं?
Seema Pahuja Supervising Disha Salian Case : लक्ष तपासावर जबाबदारी लेडी सिंघमवर | Special Report ABP Majha
PM Modi’s schoolmate Asgar Ali gets relief in land dispute : मोदींशी मैत्री अखंड; परत मिळाला भूखंड | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Relaunching : मिस यू दादा... आता वहिनींचा वादा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगे सलाईनवर, तरी ठाम निर्णयावर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs AFG : संजू आणि अभिषेकने टीम इंडियाचा टी 20 क्रिकेटमधील इतिहास भूगोलच बदलून टाकला, पावर प्ले मध्ये केली आहे आजवर कुणाला न जमणारी कामगिरी
संजू आणि अभिषेकने टीम इंडियाचा टी 20 क्रिकेटमधील इतिहास भूगोलच बदलून टाकला, पॉवरप्लेमध्ये विक्रमी कामगिरी
Abhishek Sharma: अभिषेक शर्माकडून शतकानंतर अनोखा जल्लोष, 'ओम नम:शिवाय' मंत्राचा उच्चार, Video व्हायरल
अभिषेक शर्माकडून शतकानंतर अनोखा जल्लोष, 'ओम नम:शिवाय' मंत्राचा उच्चार, Video व्हायरल
N Chandrasekaran: अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
ईडीच्या कारवाईचा धडाका, 135 कोटींच्या बँक फसवणूकप्रकरणी पुणे, मुंबईत धाड; 4 बनावट कॉल सेंटरवरही धाड
ईडीच्या कारवाईचा धडाका, 135 कोटींच्या बँक फसवणूकप्रकरणी पुणे, मुंबईत धाड; 4 बनावट कॉल सेंटरवरही धाड
दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वारा, वीजेचा कहर; दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत 5 ठार, वीज पडून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू
संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वारा, वीजेचा कहर; दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत 5 ठार, वीज पडून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू
पावसाअभावी शेतकऱ्यांवर भीषण परिस्थिती; सोयाबीनची तिरडी, अंत्ययात्रा निघाली, स्मशानभूमीत अंत्यसंस्कारही केले
पावसाअभावी शेतकऱ्यांवर भीषण परिस्थिती; सोयाबीनची तिरडी, अंत्ययात्रा निघाली, स्मशानभूमीत अंत्यसंस्कारही केले
Gokul Election: गोकुळला महायुतीच्या कारभाऱ्यांमध्येच जुंपली! हसन मुश्रीफांचा थेट खासदार धनंजय महाडिकांवर हल्लाबोल, म्हणाले, 'आमची बार्गेनिंग पॉवर कशी कमी करता येईल यासाठीच..'
गोकुळला महायुतीच्या कारभाऱ्यांमध्येच जुंपली! हसन मुश्रीफांचा थेट खासदार धनंजय महाडिकांवर हल्लाबोल, म्हणाले, 'आमची बार्गेनिंग पॉवर कशी कमी करता येईल यासाठीच..'
Embed widget