मुख्यपृष्ठPhotosपरिवर्तन रॅली : पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 महत्वाचे मुद्दे
परिवर्तन रॅली : पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 महत्वाचे मुद्दे
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 02 Jan 2017 03:38 PM (IST)
1/10
इतर पक्षांसाठी ही निवडणूक सत्ता मिळवण्याचा प्रयत्न असेल, पण भाजपसाठी 2017 ची निवडणूक एक जबाबदारी आहे : पंतप्रधान मोदी
2/10
वढ्या मोठ्या सभेला संबोधित करण्याचं सौभाग्य मला आयुष्यात कधीही मिळालं नव्हतं : पंतप्रधान मोदी
3/10
लखनऊ : आपल्या स्वार्थासाठी जनतेला दावणीला बांधणाऱ्या पक्षांना धडा शिकवा, असं आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या उत्तर प्रदेशात निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला.
4/10
निवडणुकीच्या निकालात काय होईल, हे रॅलीतील गर्दीच सांगत आहे : पंतप्रधान मोदी
5/10
लखनऊ ही अटल बिहारी वाजपेयींची कर्मभूमी आहे, टीव्हीवर ही दृश्यं पाहून अटलजींना अतिशय आनंद होईल : पंतप्रधान मोदी
6/10
30 वर्षांनंतर देशाला असं सरकार मिळालं, ज्याची हायकमांड फक्त सव्वाशे कोटी जनता आहे : पंतप्रधान मोदी
7/10
उत्तर प्रदेशमध्ये 14 वर्षांपासून विकासाचा वनवास आहे : पंतप्रधान मोदी
8/10
केंद्राचा पैसा योग्य पद्धतीने खर्च झाला असता, तर उत्तर प्रदेशचा आज कायापालट झाला असता : पंतप्रधान मोदी
9/10
दोन पक्षांमधील राजकारण आम्ही समजू शकतो. पण उत्तर प्रदेशच्या जनतेसोबत राजकारण होऊ नये : पंतप्रधान मोदी
10/10
एरव्ही कधीही एकमत न होणारे पक्ष नोटाबंदी होताच सरकारविरोधात एकवटले आहेत, असं म्हणत मोदींनी समाजवादी पक्ष, बसपावर तिखट प्रहार केला. इतकंच नाही, तर या सभेतून मोदींनी काँग्रेसचाही समाचार घेतला.