आभाळानं भरभरून दिलं, निसर्गानं किमया केली आणि धरणाचे दरवाजे 9 वर्षांनंतर ओले झाले. नाथाच्या पदस्पर्शाने पावण झालेल्या पैठण नगरीत मुक्कामी असलेले हे आहे धरण जायकवाडी.
4/13
5/13
नाथसागर.... पाण्याचा लाटांचा आवाज. हे जायकवाडी धरणाचं विस्तीर्ण रूप पाहिल्यावर या धरणाला ‘नाथसागर’ का म्हणतात हे लक्षात येतं. जायकवाडी धरणात हे पाणी ड्रोन कॅमेच्यारच्या नजरे पलीकडचे आहे. तब्बल 9 वर्षानंतर हे धरण पहिल्यांदाच भरले आहे.
6/13
7/13
पाहा आणखी फोटो....
8/13
नाथांनी वाळवंटात तडफडत असणाऱ्या गाढवाला काशीवरून आणलेलं पाणी पाजलं होतं. या धरणावर औरंगाबाद, जालना, गेवराई, अंबड शहरांसह सुमारे 386 गावांची तहान भागवण्याची जबाबदारी आहे. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड जिल्ह्यांतील 2 लाख 77 हजार हेक्टर शेतीही याच पाण्यावर हिरवीगार होते. त्यामुळे भरलेलं हे धरण पाहून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतो आहे.
9/13
पाण्यासाठी गोदामाईच्या लेकरांनी भांडणं केली. प्रसंगी कोर्टाच्या पायऱ्या चढल्या. कोर्टाच्या आदेशावरून दोन वेळा जायकवाडीत पाणी सोडण्यातही आलं. आज हे दृश्य पाहून डोळ्यात साठवून ठेवावं वाटतं.
10/13
औरंगाबाद, जालना जिल्ह्यांतील 5 औद्योगिक वसाहतीही याच धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. दुष्काळाने धारण शून्य टक्क्यावर गेले. त्यामुळे उद्योगचं पाणी 50 टक्के कमी केलं गेलं आता धरण भरले आहे.
11/13
शंकरराव चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळे गोदावरी नदीवर या धरणाचा जन्म झाला. 1976 ला इंदिरा गांधी यांनी लोकांची तहाण भागवण्यांची जिम्मेदारी सोपवली.
12/13
अफाट, अचाट, अतिभव्य, नयनरम्य या सर्व उपमा फिक्या पडत आहेत. कारण कित्येक वर्षांनंतर या धरणात पाणी मावेनासा झाला आहे.
13/13
102 टीएमसी पाणीसाठी इतकी अजस्त्र पाणी क्षमता, त्यामुळे गोदावरी नदी खळखळून वाहिली की मराठवाड्यातील लोकांचा पाण्याचा प्रश्न 2 वर्षांसाठी तरी सुटलाच समजा. 21 हजार 750 किलोमीटर स्क्वेअर पाणलोट क्षेत्र आहे. आज निसर्गानं भरभरून दिलं आहे. त्यामुळे याचा वापरही योग्य केला पाहिजे.