बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया चेन्नईत पोहचली; रोहित शर्मासोबत कोण कोण?
भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन समान्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपहिला कसोटी सामना 19 सप्टेंबर रोजी रंगणार आहे. चेन्नईत हा सामना खेळवण्यात येणार आहे.
पहिल्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाचे खेळाडू चेन्नईत पोहचले आहेत.
एनआयने भारतीय संघ चेन्नईला पोहोचल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये केएल राहुल आणि जसप्रीत बुमराहसह अनेक खेळाडू हॉटेलमध्ये जाण्यासाठी बसमध्ये चढताना दिसत होते.
19 सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडियाचे खेळाडू सराव शिबिरात भाग घेतील. हे शिबिर 18 सप्टेंबरपर्यंत चालणार असल्याची माहिती आहे.
अनेक भारतीय खेळाडू दीर्घ विश्रांतीनंतर क्रिकेटच्या मैदानात परतत आहेत. भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सुमारे अडीच महिन्यांच्या विश्रांतीनंतर क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करत आहे. याआधी भारतीय वेगवान गोलंदाज 2024 च्या टी-20 विश्वचषकाची फायनल खेळताना दिसला होता.
याशिवाय विराट कोहली आणि रोहित शर्मा एका महिन्याहून अधिक कालावधीनंतर पुनरागमन करत आहेत.
विराट कोहली आणि रोहित शर्मा याआधी ऑगस्टच्या सुरुवातीला श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत दिसले होते.