Mumbai Indians : मुंबई इंडियन्सचं कॅप्टन कुणी व्हावं? टीम इंडियाच्या खेळाडूला प्रश्न, रोहित अन् हार्दिक सोडून तिसरं नाव सांगितलं
Mumbai Indians : मुंबई इंडियन्सचं नेतृत्त्व हार्दिक पांड्याकडे दिल्यावरुन मोठा वादंग निर्माण झाला होता. पुढच्या आयपीएलमध्ये कुणी नेतृत्त्व करावं याबाबत अमित मिश्राला प्रश्न विचारण्यात आला होता.
रोहित शर्मा हार्दिक पांड्या
1/5
टीम इंडियाचा आणि लखनौ सुपर जाएंटसचा खेळाडू अमित मिश्रानं एका पॉडकास्टमध्ये विविध विषयांवर भाष्य केलं. मुंबई इंडियन्सचा कॅप्टन कोण व्हावं, असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता.
2/5
शुभंकर मिश्रा याच्या पॉडकास्टमध्ये अमित मिश्रानं महेंद्रसिंग धोनी, लखनौचा कॅप्टन केएल राहुल यांच्याविषयी भाष्य केलं. महेंद्रसिंह धोनी पुढच्या आयपीएलमध्ये काही सामने खेळेल, असंही त्यानं म्हटलं.
3/5
मुंबई इंडियन्सचं कॅप्टनपद हार्दिक पांड्याकडे देण्यात आलेलं आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वात मुंबई इंडियन्स दमदार कामगिरी करु शकलेली नाही.
4/5
मुंबई इंडियन्सबाबत प्रश्न विचारला असता अमित मिश्रानं रोहित शर्मानं त्याला पुन्हा कॅप्टनपद मिळाल्यास मुंबईसोबत थांबावं असं म्हटलं. कारण रोहित शर्माचं त्या टीम सोबत भावनिक नातं आहे, असं अमित मिश्रा म्हणाला.
5/5
अमित मिश्राला ज्यावेळी मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा किंवा हार्दिक पांड्या या पैकी कुणी व्हावं, असं विचारलं असता त्यानं सूर्यकुमार यादवचं नाव सांगितलं.
Published at : 16 Jul 2024 12:22 PM (IST)
= 5">