Nashik Long March : लाल वादळ इगतपुरी तालुक्यात दाखल...
तब्बल चार वर्षांनंतर पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा आवाज विधानभवनावर (Vidhanbhavan) घुमणार असून नाशिकमधून निघालेलं लाल वादळ दोन दिवसांत 66 किलोमीटरचं अंतर कापलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलाल वादळाच्या लॉन्ग मार्चचा आजचा तिसरा दिवस असून शेतकरी वर्गाचा हा लॉन्ग मार्च आतापर्यंत इगतपुरी तालुक्यात दाखल झालाय.
मात्र या 66 किलोमीटरच्या अंतरात मोर्चेकऱ्यांचे पाय सुजायला सुरुवात झाली असून मात्र विधानभवनावर धडक देणार असल्याचे मोर्चेकऱ्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात काही महिन्यांपूर्वी सरकार बदललं, मात्र आजही सामान्य नागरिक शेतकरी आपल्या प्रश्नासाठी झगडतो आहे.
अशातच गेल्या काही दिवसांपासून शेती मालाला भाव नसल्याने शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. इकडे लाल वादळाने एकत्र येत पुन्हा सरकारला घाम फोडण्यासाठी लॉन्ग मार्चचं आयोजन केले.
त्यानुसार मागील 48 तासांपासून हजारो शेतकरी लॉन्ग मार्चच्या माध्यमातून पायी चालत आहेत. दिंडोरी (dindori) येथून निघालेला पायी लॉन्ग मार्च काल शहरातील जवळील आरोग्य विज्ञान विद्यापीठातील मुक्कामांनंतर नाशिक शहरातून पुढे निघाला.
आता हा मोर्चा घोटी शहरानजीक असून आतापर्यंत या मोर्चाने जवळपास 66 किलोमीटरहून अधिक अंतर कापलं आहे.
पायी लॉन्ग मार्चचा आजचा तिसरा दिवस असून नाशिकनंतर (Nashik) घोटी परिसरात हा मोर्चा विसावणार असल्याचे समजते.
मात्र या दोन दिवसांच्या प्रवासानंतर अनवाणी पाय सुजू लागले आहेत, बोलू लागले आहेत. मात्र प्रश्न सुटले पाहिजेत ही आस घेऊन शेतकरी कष्टकरी वर्ग पायी चालत आहे.
आजपर्यंत सरकार कुणाचंही असले तरीही सामान्यांच्या, शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देण्याचे काम केले जात असल्याचे मोर्चेकऱ्यांचं म्हणणं आहे.
म्हणून भर उन्हात, रस्त्यावरील डांबर तुडवत हे लाल वादळ उन्हात राबणाऱ्या पायांमुळे विधानभवनावर झेपावत आहे.