Maharashtra Rain : पावसाची जोरदार बॅटिंग! अनेक नद्यांना पूर, कोकणातील काही गावात पूरपरिस्थिती
Maharashtra Rain Update : हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सर्वदूर पावसाने हजेरी लावल्यानं पेरणी झाल्यानंतर आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यात पुढील पाच दिवस दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा सर्वत्र चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
कोकणातील काही जिल्ह्यात सतत पावसामुळं अनेक नद्यांना पूर आला असून त्यामुळं काही गावांमध्ये पाणी शिरलं आहे. पाण्यात अडकलेल्या लोकांना रेस्क्यू करण्याचं काम सुरु असल्याची माहिती आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे तिलारी, सुखनदी, निर्मला नदीला पूर येण्याची परिस्थिती आली आहे. अनेक ठिकाणी भातशेती पाणी पाण्याखाली गेली आहे. रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचलं आहे.
पावसाचा जोर वाढत असल्यानं रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर शहराला पाण्याचा धोका देखील वाढत आहे. सध्या या ठिकाणीहून व्यापाऱ्यांनी आपला माल सुरक्षित स्थळी हलवला असून नागरिकांना देखील इशारा देण्यात आला आहे
वारी दुपारपासून सुरू झालेल्या पावसानं जिल्ह्यात जोरदार बॅटिंग सुरू केल्यानं राजापूर शहरा जवळून वाहणाऱ्या अर्जुना आणि कोदवली या नद्यांना पूर आला आहे.
चिंताग्रस्त असलेला कोकणातील शेतकरी या पावसामुळे काहीसा सुखावला असून शेतीच्या कामांना पुन्हा एकदा जोर घेतला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे तिलारी, सुखनदी, निर्मला नदीला पूर येण्याची परिस्थिती आली आहे. अनेक ठिकाणी भातशेती पाणी पाण्याखाली गेली आहे. रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचलं आहे.
रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील वावलोटी आणि सुपेगाव हे दोन्ही गावात पाणी शिरले आहे. वावटोली आणि सुपेगाव गावातील नागरिकांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आलं आहे.
कुंडलिका रिव्हर्सची रेस्क्यू टीम मुरुडकडे रवाना झाली आहे. मुरुड - आगरदांडा रस्तेमार्गावर पाणी साचल्याने रस्ता पाण्याखाली गेला आहे. मुरुड तालुक्यात गेल्या २४ तासात ३४८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. रात्री झालेल्या पावसामुळे मुरूडनजीक नांदगाव, मजगाव, उसरोलीमध्ये पण पाणी भरले आहे.
परभणीत 15 वर्षानंतर सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. ओढ्याच्या पुरात अडकलेल्या 12 जणांना वाचवलं आहे.